पुणे – गेली 15 वर्षे ज्यांना भोंग्याचा त्रास झाला नाही त्यांना आपला भाऊ मुख्यमंत्री झाल्यावरच त्रास सुरू झाला, हा पोटदुखीतून सुरू झालेला त्रास आहे असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना लगावला आहे. ते पुण्यामध्ये बोलत होते.
राऊतांची तोफ आज पुण्यात धडाडणार; भोंगा, हनुमान चालिसा, हिंदुत्व, नेमकं काय बोलणार?
संजय राऊत म्हणाले की, “आज लोक पेटवा-पेटवीची भाषा करताहेत, आमचं संपूर्ण आयुष्य गेलं, सवाल ये नही की बस्ती मे आग कैसे लगी, सवाल ये हे की बंदर के हात माचीस किसने दी. पण माचिस देऊन पण उपयोग नाही, ती पेटायला काही तयार नाही. सर्व दारुगोळा शिवसेनेकडे आहे. शिर्डी, पंढरपूर याठिकाणी लोकांना आज काकड आरती घेता नाही आली. हजारो भाविक याला मुकले. यांच्यामुळे हिंदूंचा गळा आवळला गेला. सेनेला संपवण्यासाठी भाजपकडून सुपाऱ्या दिल्या जातात आणि त्या स्वीकारल्या जातात”
शिर्डीत मुस्लिम समाजाचा नवा आदर्श; रोहित पवार म्हणाले, इथल्या जनतेच्या रक्तात ती भिनलीय
तुम्ही भोंग्यांचं राजकारण सुरु केले, जिवंतपणी बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला, ज्यांनी बाळासाहेबांना जिंवतपणी यातना दिल्या ते आम्हाला बाळासाहेब सांगताहेत? असा टोला संजय राऊत यांनी राज ठाकरेंना लगावला. ते पुढे म्हणाले की, “शिवाजी महाराजांचा भगवा आहे हा. बाळासाहेबांचं स्मरण केल्याशिवय दिवस उजाडत नाही. त्यांनी महाराष्ट्र घडवला, शिवसेना उभी केली, स्वाभिमान दिला. बाळासाहेबांच्या जवळून 30 वर्ष काम करणारा मी आहे.”
Read also:
- गुन्हे केवळ आमच्यावरच सिद्ध होतात इतरांवर नाही; राणा दाम्पत्याच्या जामिनावर राऊतांचा टोला
- “मराठा आणि ओबीसी समाजाला कळून चुकलं की पवारसाहेब काय आहेत. मराठा आरक्षणासाठी त्यांनी काय केलं?”
- “कुणी राजकीय बाजार भरवत असेल तर त्यालाही..”; राष्ट्रवादीचा मनसेला कडक इशारा
- राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षापदी विद्या चव्हाण यांची वर्णी; पहिल्यांदाच विभागनिहाय अध्यक्षांचीही निवड
- भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी भाजप सरकार जबाबदार; शरद पवारांची साक्ष
- दानवे म्हणाले, ‘ब्राम्हण मुख्यमंत्री’, अजितदादा म्हणाले, ‘तृतीयपंथी मुख्यमंत्री’?