सांगली – कशासाठी काढताय तुम्ही भोंगे..का करताय तुम्ही अशी सोंगे? अशा आशयाची शेरेबाजीकरून आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले सांगलीत राज ठाकरे यांच्या भोंग्यांविरोधातील आंदोलनावर टीका केली. एक दोन वेळी त्यांचा अजान असो आणि आपण समजून घेत नाहीत. आपले गणेशोत्सव, नवरात्रोत्सव याना ते विरोध करत नाहीत, मग आपण अशी दादागिरी करणं योग्य नाही, असं रामदास आठवलेंनी म्हटलं आहे.
राज्यात मनसेचं जोरदार आंदोलन; गैरहजर असणाऱ्या वसंत मोरेंनी सोडलं मौन, म्हणाले..;
शीर्ष कवितांसाठी प्रसिद्ध असलेल्या रामदास आठवले यांनी विविध विषयांवर चारोळ्या करून उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन केलं. तसेच कवितांच्या माध्यमातून सध्या सुरु असलेल्या राजकारणावर टीकाही केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे यावेळी त्यांनी कान टोचले.
रामदास आठवले म्हणाले,” मी अनेक वेळा सांगतो मुस्लिम समाज हा हिंदूच होता. अडीच हजार वर्षांपूर्वी या देशात सम्राट अशोकपूर्वी सर्व देश बौद्ध होता. सगळेच बौद्ध होते. शंकराचार्यानी हिंदू धर्माची स्थापना केली. नंतर सगळा देश हिंदू झाला. मोगल या ठिकाणी आले. आणि आपले हिंदू समाजाचे लोकचं मुस्लिम झाले. इंग्रज या ठिकाणी आले त्यावेळी हिंदू समाजाचे लोक ख्रिश्चन झाले. विनाकारण आपण असा वाद लावण्याचा आवश्यकता नाही. त्यांचा भोंगा आवडत नसेल तर आम्ही आमची भीमजयंती साजरी करतो. रात्री दहा वाजता माईक बंद होतो. आपण नवरात्र आणि गणेशोत्सव साजरा करतो, त्यावेळेला त्यांना त्रास होत नाही का? तुम्हाला अजान ऐकायचं नसेल तर ऐकू नका. पण अशी दादागिरीची भूमिका योग्य नाही.”
दानवे म्हणाले, ‘ब्राम्हण मुख्यमंत्री’, अजितदादा म्हणाले, ‘तृतीयपंथी मुख्यमंत्री’?
सांगलीमधील आटपाडी येथे झालेल्या या मेळाव्यात रामदास आठवले यांनी स्थानिकांनाही चांगलेच खुश केले. यावेळी तयांनी एक शीघ्र चारोळी केली ती अशी-
मी आलो आहे आटपाडीच्या घरात
कारण जिल्हाध्यक्ष आहेत राजेंद्र खरात
आता विट्याला जाणार आहे आमची वरात
म्हणूनच आरपीआय आले आहे भरात
माझ्या भीमाचं योगदान आहे माझ्या लालबत्तीच्या गाडीला
म्हणूनच मी आलेलो आहे आटपाडीला जर कुणी लावला माझ्या गाडीला
आग लावून टाकेल मी त्याच्या माडीला
Read also:
- मनसे नेते संदीप देशपांडे अजूनही फरार, पोलिसांकडून ड्रायव्हरला अटक
- राज यांच्या मागे कोर्टाचा ससेमिरा; राज ठाकरेंच्या अडचणीत वाढ
- “मराठी माणसांच्याही मर्सिडीज असायला पाहिजेत, पण कष्टाच्या; चोरीच्या नको” संजय राऊतांचा फडणवीसांना टोला
- “त्यांना आपला भाऊ मुख्यमंत्री झाल्यावरच त्रास सुरु झाला”
- गुन्हे केवळ आमच्यावरच सिद्ध होतात इतरांवर नाही; राणा दाम्पत्याच्या जामिनावर राऊतांचा टोला
- “मराठा आणि ओबीसी समाजाला कळून चुकलं की पवारसाहेब काय आहेत. मराठा आरक्षणासाठी त्यांनी काय केलं?”