पुणे : ऐननिवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत दोन गट पडल्याने राज्यातील राजकीय समीकरणं बदललीत. आता लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांकडून एकमेकांवर आरोपांच्या फैऱ्या झाडल्या जात आहेत. अशातच आता अजित पवार गटातील आमदार सुनील शेळके यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
हेही वाचा…“बारामतीसाठी शेवटचे सात दिवस राखून ठेवा”, अजितदादांनी महायुतीच्या नेत्यांना दिल्या सूचना
सुनील शेळके पिंपरी चिंचवडमध्ये आले असता. त्यांनी रोहित पवारांवर जोरदार हल्लाबोल केलाय. ते म्हणाले की, “रोहित पवारांना स्वतःच कर्तृत्व सिद्ध करायचं आहे. पण, अजित पवारांनी महाराष्ट्रासाठी गेली २५ वर्ष झालं रक्ताचं पाणी केलं आहे. त्या अजित पवारांवर बोलून रोहित पवारांना मोठं व्हायचं आहे. मुळात अजित पवार यांनीच रोहित पवारांना राजकारणात आणलं आहे. कर्जत-जामखेडला उमेदवारी मिळवून त्यांना आमदार केलं. मतदारसंघाचा विकास केला. शेळके, लंके यांच्या पेक्षा अधिक प्रेम दिलं. पण, रोहित पवारांना अजित पवारांची जागा घ्यायची आहे. त्यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न पडत आहे. म्हणून अजित पवारांवर ते टीका करतात.
हेही वाचा…“पहिल्या टप्प्यात भाजपची सर्वत्र पिछेहाट, त्यामुळेच भाजपा निवडणुकीत बावचळली”
“२०१९ ला ज्या घडामोडी घडल्या. त्या घडत असताना सर्व नेते एकत्र होते. कुठली भूमिका बदलायची?, कुणाला कुठली खाती द्यायची?, महायुतीत गेल्यास आपल्याला काय मिळेल?, या सर्व घडामोडी प्रत्येकाला माहीत आहेत. तरीही केवळ अजित पवारांना व्हिलन केलं जातं आहे. यावर अजित पवारांनी प्रत्यक्षात बोलावं. अजित पवारांना विरोधक व्हिलन, मलिदा गँग म्हणून बोलत आहेत. अजित पवारांनी सांगावं अशी वेळ आली आहे. त्यांनी त्यांची भूमिका मांडल्यास रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांना रस्त्यावर जनता फिरू देणार नाही”, असंही सुनील शेळके म्हणाले आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“सर्वसामान्यांचा लक्ष वळवण्याचा मोदींचा किळसवाणा डाव”, कॉंग्रेसची मोदींवर जहरी टिका
हेही वाचा…“..तर राजकारण सोडेन, “राणा जगजितसिंह पाटलांचं निंबाळकरांना खुलं आव्हान