अहमदनगर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या कारखान्यांवर प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यांसंबंधी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. पवार म्हणाले, ‘कालच जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे निकाल लागले. त्यात महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही कारवाई झाली. त्यामुळे राजकीय दृष्टीने अशी कारवाई होत असेल तर ती चुकीची असल्याचे आता लोकच म्हणू लागले आहेत,’ असे पवार म्हणाले.
लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ 11 ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक; राज्य सरकारचा मोठा निर्णय
आमदार पवार जामखेड तालुक्यातील चौंडी येथे आले होते. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना या छाप्यांसंबंधी प्रतिक्रिया विचारली. त्यावर ते म्हणाले, ‘या कारवाईसंबंधी अधिक माहिती माझ्याकडे आता नाही. पण एक योगायोग पहा, काल जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या. त्यात महाविकास आघाडी सरकारला चांगले यश मिळाले आहे. लगेच दुसऱ्या दिवशी हे छापे टाकले. त्यामुळे ही निवडणूक आणि आजचे छापे यांचा काही संबंध आहे का, हेही तपासून पाहावे लागले. मात्र, राजकीय हेतू ठेवून अशा गोष्टी होत असतील तर आता लोकंसुद्धा याबाबतीत कंटाळलेली आहेत. या छाप्यांच्या बाबतीत आणखी खोलात जाऊन माहिती घ्यावी लागेल. मात्र, अशा पद्धतीची वागणूक योग्य नाही, असे माझे आणि सर्वसामान्य लोकांचेही म्हणने आहे,’ असेही पवार म्हणाले.
माझ्यावरील कारवाई समजू शकतो, पण बहिणींच्या कंपन्यांवर छापेमारी का? – अजित पवार
उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील घटनेवरही आमदार पवार यांनी भाष्य केले. ‘विविध विषयांवर सतत बोलणारे भाजपचे नेते या विषयावर काहीच का बोलत नाहीत, असा सवाल करून त्यांना वरिष्ठांकडून यावर न बोलण्याच्या सूचना आल्या की काय,’ असा संशयही पवार यांनी व्यक्त केला.
जरडेंश्वर कारखान्यांवर आयटीचा छापा; अजित पवारांच्या निकटवर्तींयांवर कारवाई?
पवार म्हणाले, ‘लखीमपूरमध्ये शेतकरी आणि पत्रकाराला चिरडले गेले. वास्तविक तेथे शांततेत आंदोलन सुरू होते. मात्र, मनात अंहकार ठेवून आपलेच राज्य आहे, सामान्य लोक काय करू शकतात, असे वाटून तेथील शेतकऱ्यांना चिरडले. मात्र, वाईट याचे वाटते की आजपर्यंत भाजपच्या कोणत्याही मंत्र्याने अगर नेत्याने यावर वक्तव्य केलेले नाही. त्यांना तसे वरून सांगितले असावे. किंवा त्यांना याचे राजकारण करायचे असेल.’
Read Also :
- शरद पवारांच्या गावातही पोहोचले ईडीचे पथक; काटेवाडीत एकाची चौकशी, राष्ट्रवादीच्या अडचणीत वाढ
- पिकांच्या नुकसान भरपाईसाठी 365 कोटी 67 लाख रुपये मंजूर; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
- राणेंना डच्चू: मुनगंटीवार, शेलार, गावित, वाघ यांना भाजपकडून बढती; पक्षाने सोपविली मोठी जबाबदारी
- जरंडेश्वर साखर कारखान्याचा खरा मालक कोण? हे अजित पवारांनी सांगावे – किरीय सोमय्या
- मोठी बातमी! काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांचं घर पेटवण्याचा प्रयत्न, कोणी केला हल्ला?