मुंबई : दोन दिवसापुर्वी सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटातील वकिलांनी धनुष्यबाण गोठवण्याची मागणी केली. त्याचवेळी अगोदर अपात्र आमदारांवरील याचिकेवर निर्णय घ्यावा असा युक्तिवाद उद्धव ठाकरे यांच्या वकिलांनी केला. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने पुढची तारिख दिली आहे. त्यामुळे आता राज्यात धनुष्यबाणावर राज्यात वादंग निर्माण झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी शिंदे गटाला सल्ला दिला आहे.
“तेव्हा याकुब मेमनची कबर सजवत बसले अन् आता म्हणे माझ्या बापाच्या नावाने मतं मागू नका”
रूपाली पाटील यांनी थेट भाजपवर आरोप केला आहे. त्या म्हणाल्या की, भाजपने शिवसेना फोडली. बंडखोर आमदार शिंदे गट यांनी शिवसेनेच्या चिन्हावर बेकायदेशीर हक्क सांगण्यापेक्षा भाजपमध्ये विलीन व्हा. नाहीतर स्वत: चा पक्ष स्थापन करा महाराष्ट्राच्या जनतेला का वेठीस धरता. असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने कायद्याने न्याय मिळतो हा विश्वास कायम ठेवणे गरजेचे आहे असंही त्या म्हणाल्या.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा आमच्याच बाजूने लागणार आहे. मात्र तसं झालं नाहीतर जो आम्ही देखील त्या पद्धतीची तयारी करणार आहोत. कारण आता यापुढे जो कोणी हिंदुत्वाचा ज्वंलत विषय पुढे घेऊन जाणार आहे. त्यांनाच लोकांची साथ असणार आहे. शिवसेनेला चिन्ह मिळवण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे. पण आमची संघटना आहे. चिन्ह घरोघरो पोहचवू असा निर्धार देखील मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या मागच्या काळात काॅंग्रेसचे देखील निवडणुक चिन्ह गोठवण्यात आलं होतं. परंतु तेव्हा काॅंग्रेस ती निवडणुक जिंकली होती. कितीही काहीही करा पण चिन्ह आम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे आम्हालाच चिन्ह मिळणार, तसेच नाहीच मिळालं तर चिन्ह घराघरात पोहचवू. हा विश्वास आमच्या सर्व शिवसैनिकांना आहे. असं मत शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केलं आहे.
Read also
- “राहुल गांधींची पदयात्रा ही मायबाप जनतेच्या सेवेसाठी”; सुप्रिया सुळे
- “मंत्रीपदासाठी शिंदे गटात सहभागी झालो नाही, मी स्वत: ला मुख्यमंत्री समजतो”; बंडखोर आमदार
- “शिवसैनिकांच्या हातांवर घड्याळ बांधणार का ?” शालिनी ठाकरेंचा पेडणेकरांना सवाल
- “प्रत्येकाला बारामती मतदारसंघ हवासा वाटणे, यात काही गैर नाही”; सुप्रिया सुळे
- “तेव्हा उद्धव ठाकरे अन् आघाडी सरकार झोपा काढत होते का ?” मनसेचा सवाल