पुणे : वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पानंतर आता टाटा समुहाचा 22 हजार कोटीचा एअरबस प्रकल्प देखील गुजरातला गेल्याने विरोधकांनी रान पेटवलं आहे. यावरून राज्यात आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपांच्या फैऱ्या सुरू झाल्या आहेत. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर चिखल फेक सुरू असताना राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी महाराष्ट्रातील भाजप केंद्रातील लाड पुरवता पुरवता महाराष्ट्र भिकेला लावणार असं म्हणत लोकांनो जागे व्हा. असं देखील त्यांनी आवाहन केलं आहे. त्यामुळे राज्यात सध्या राजकीय वातावरण चांगलंच पेटलं आहे.
“..तर एक दिवस शिंदे सरकार मुंबईलाही गुजरातला देऊन टाकतील”
नागपुर येथील मिहान येथे प्रस्तावित असलेला प्रकल्प गुजरातला गेला. त्यामुळे आता पर्यंत महाराष्ट्रातील सर्वात 4 मोठे प्रकल्प गुजरातला गेल्याने विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. यावर बोलताना रूपाली पाटील म्हणाल्या की, महाराष्ट्रातील 4 था प्रकल्प गुजरातला गेला आहे. मात्र भाजपचे नेते चिडीचुप झाले आहेत. पुणे मनपा सिक्युरिटीचे पगार तीन ते चार महिन्यापासून प्रलंबित आहेत. ते त्यांना पुणे मनपा देत नाहीत. पुण्यातील भाजपने चिडीचुप राहण्याचा चंग बांधला आहे. असं म्हणत रूपाली पाटलांनी भाजपवर देखील हल्लाबोल केला.
“आपले मुख्यमंत्री दहीहंडी, मंडळ, फोडाफोडी या व्यतिरिक्त काहीच करत नाहीत”
रोजगार नाही, तसेच ज्यांना रोजगार आहे त्यांना महाराष्ट्रातील भाजप पगारपाणी देत नाही. त्यामुळे केंद्रातील लाड पुरवता पुरवता महाराष्ट्रात भिकेला भाजप भिकेला लावणार आहे. जागे व्हा. नाहीतर विकासाच्या नावावर, खोट्या गुन्ह्याच्या धमक्या, दबाव देऊन, स्वत: चे नाकर्ते खापर दुसऱ्यावर फोडून आपल्या महाराष्ट्राला रितसर भिकेला लावणार. असं म्हणत मुंबईचे महत्व कमी करून महाराष्ट्र संपवण्याचा घाट वेळीस हाणून पाडला पाहिजे. जागे व्हा. महाराष्ट्रातील लोकांनो असं म्हणत त्यांनी जनतेला आवाहन केलं आहे.
“25 पैशांवर नारायण राणेंचा फोटो.. हे फायनल करा..!” वादग्रस्त पोस्ट व्हायरल
दरम्यान, एअरबस प्रकल्प गुजरातमधील बडोद्याला होत असून त्यातून सुमारे 6 हजार रोजगार निर्मिती होणार होती. 22 हजार कोटीचा प्रकल्प महाराष्ट्रातून गेल्याने महाराष्ट्रातील इतर प्रकल्प देखील जाण्याची भिती आता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री म्हणत आहेत की यापेक्षा मोठा प्रकल्प गुजरातला देणार. पंरतु आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजप महाराष्ट्रासोबत खेळी करीत आहे की काय ? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.
Read also
- “खेकड्यांची चाल लोकं स्विकारत नाही, हिमंत असेल तर याचा पुरावा द्या”; रोहित पवार
- अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, गंगाखेडचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे
- “राष्ट्रवादीने २३ वर्षात साडेसतरा वर्ष सत्तेत राहून जनसेवा केली”
- “मिंधे-फसनवीस सरकारने आता ‘जय जय गरवी गुजरात’ हा नारा बुलंद द्यावा”; सेेनेची जहरी टिका
- “सध्याच्या घडीला नारायण राणेंची किंमत चार आण्याची आहे”