मुंबई: महाराष्ट्रात कोरोना या महामारीत राजकारण चांगलेच ढवळून निघाले. राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्षात त्याच प्रमाणे महाविकास आघाडी आणि केंद्र सरकार यांच्यात चांगलाच संघर्ष झाला आहे.कोरोना लसीकरण, लसींचे दर, रेमेडीसीवर चा पुरवठा, ऑक्सिजनचा पुरवठा या विषयांवरून एकमेकांवर मोठ्या प्रमाणात टीका देखील केल्या आहे. आता नुकतेच केंद्र सरकारकडून महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन चे टॅंक पाठवण्यात आले आहेत. विशाखापट्टणम च्या एका प्लांट मधून हा ऑक्सिजन साठा महाराष्ट्रासाठी देण्यात आलेला आहे. आता यावरून पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात कुरबुरी वाढू लागल्या आहेत.
राज्यातील कोरोनाची बाधितांची परिस्थिती गंभीर आहे. ऑक्सिजन, रेमडेसिवीर आणि व्हेंटीलेटरचा काही प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. याबाबत राज्य सरकार केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे केंद्रातून महाराष्ट्राला सर्वाधिक मदत मिळाली असल्याचा दावा करत आहेत. महाराष्ट्रातील नागरिकांना सर्वाधिक मदतीबद्दल पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांचे अनेकानेक आभार. महाराष्ट्राला सर्वाधिक १७८५ मेट्रीक टन ऑक्सिजन, जो की गुजरात, उत्तरप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश यांच्यासह कोणत्याही प्रमुख राज्याशी तुलना केली तर जवळजवळ दुप्पटीहून अधिक आहे असे त्यांनी ट्विट मध्ये म्हटले होते.
आता काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी फडणवीसांवर यावरून टीका केली आहे. कोरोना महामारीच्या संकट काळात खोटा बोला पण रेटून बोला असे धोरण भारतीय जनता पक्ष आणि फडणवीसांनी महाराष्ट्राच्या बाबतीत निवडले आहे. महाराष्ट्रातील ऑक्सिजन प्लांट मधूनच जास्तीत जास्त ऑक्सिजन साठा हा आलेला आहे. केंद्र सरकारने जरी तो दिला असेल तरी पण महाराष्ट्राची ऑक्सिजन निर्मितीची क्षमता ही १२५० मेट्रिक टन आहे. केंद्राला ५०० मेट्रिक टन ऑक्सिजन मागितला असताना केंद्राने अतिरिक्त फक्त ३४५ मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी आता खोटे बोलणे थांबवावे आणि धूर्त पणे राजकारण करू नये असा टोला देखील सचिन सावंत यांनी मारला आहे.
महाराष्ट्र को सब ऑक्सीजन मोदी जी दे रहे हैं यह सफेद झूठ
फडणवीसजी, झूठ बोलकर मोदीजी को श्रेय देने का काम बंद कीजिए। pic.twitter.com/KN354JVLFc— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) April 26, 2021