नाशिक : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून खासदार संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत. या मागण्या 6 जूनपर्यंत मान्य न केल्यास त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
आता संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडाकडे कूच करा, असे आदेश दिले आहेत. सध्या कोरोनामुळे राज्यात जिल्हाबंदीचा नियम लागू आहे. मात्र, मिळेल त्या वाहनाने रायगडावर या, असे संभाजीराजे यांनी नाशिकमध्ये बोलताना सांगितले.
संभाजीराजे यांनी रायगडावरून आंदोलनाला सुरू करणार असल्याचे म्हटले होते. तसेच, नवीन पक्ष स्थापनेबाबत देखील त्यांनी संकेत दिले होते. त्यामुळे आता 6 जूनला संभाजीराजे काय घोषणा करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
7 जूनपर्यंत जर सरकारनं मी सांगितलेल्या पाच गोष्टींवर निर्णय घेतला नाही, तर आम्ही कोविड वगैरे काही बघणार नाही. 6 जूनपर्यंत मी अल्टिमेटम देत आहे. त्यानंतर रायगडावरून आंदोलनाला सुरुवात करणार असल्याचा इशारा काही दिवसांपूर्वीच संभाजीराजेंनी दिला होता.
Read Also :
- ‘पेट्रोल-डिझेलची ‘शंभरी’ केल्याबद्दल मोदी सरकारचे अभिनंदन’, काँग्रेसचा पुणेरी टोला
- पहिल्यांदा संसदेत जाताना शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना दिला होता ‘हा’ मोलाचा सल्ला
- ‘संभाजीराजेंची हेरगिरी करण्याचा प्रश्नच नाही, त्यांचा गैरसमज दूर केला’
- मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलेल्या ‘त्या’ सरपंचांनी गाव कोरोनामुक्त कसे केले ? वाचा