मुंबई : दिल्लीतील महाराष्ट्राचा एक महत्त्वाचा आवाज म्हणून खासदार सुप्रिया सुळेंकडे पाहिले जाते. आपल्या कार्यामुळे सुप्रिया सुळेंना संसदरत्न म्हणून देखील गौरवण्यात आले आहे. आता त्यांनी पहिल्यांदाच संसदेत जात असताना आलेला अनुभव सांगताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी काय सांगितले होते याचा खुलासा केला आहे.
‘लोकसत्ता’ या वृत्तपत्राकडून आयोजित एका कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केले. यावेळी बोलताना संसदेत पहिल्यांदा जाताना वडील शरद पवारांना काय सल्ला दिला होता हे देखील सांगितले.
एका प्रश्नाला उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्रातून निवडून जाते तर महाराष्ट्राशिवाय मला दिल्ली मिळणारच नाही. मला आई-बाबा खूप कमी सल्ले देतात पण त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या आहेत ज्या मी आवर्जून लक्षात ठेवते.
‘मी पहिल्यांदा संसदेत जाताना शरद पवारांनी सांगितलं होतं की, तू संसदेमध्ये पहिल्यांदा जात आहेस. ती पायरी चढण्याची संधी मिळत आहे हे तुझं भाग्य आहे. बारामतीमधल्या लोकांमुळे ही संधी मिळाली आहे हे लक्षात ठेव. जेव्हा तुला ही पायरी मी चढत आहे आणि बारामतीच्या लोकांना विसरशील त्यादिवशी ती पायरी तुला चढता येणार नाही. ही गोष्टी मी पक्की लक्षात ठेवली आहे.’
दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्र असेल तर दिल्लीच आहे. महाराष्ट्रातून कामं, निवडणूक सोडलं तर दिल्लीत कोणी विचारणार नाही. हे वास्तव आहे याची जाणीव मला आहे, असा सल्ला वडिलांनी दिल्याचे सुप्रिया सुळेंनी सांगितले.
Read Also :
- ‘संभाजीराजेंची हेरगिरी करण्याचा प्रश्नच नाही, त्यांचा गैरसमज दूर केला’
- मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलेल्या ‘त्या’ सरपंचांनी गाव कोरोनामुक्त कसे केले ? वाचा
- अहमदनगरच्या नामांतरासाठी मनसे आक्रमक, केली ‘हे’ नाव देण्याची मागणी
- ‘संभाजीराजेंनी पक्ष काढल्यावर मला त्यांच्या पक्षात घेतील का माहिती नाही’
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळच्या कार्यकर्त्यावर गोळीबार