अहमदनगर : गेल्या काही दिवसात सातत्याने औरंगाबाद, पुणे शहराचे नाव बदलण्याची मागणी केली जात आहे. आता या शहरांच्या यादीत अहमदनगरचा देखील समावेश झाला आहे. मनसेने अहमदनगरचे नाव बदलून ‘अंबिकानगर’ अशी मागणी केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी शहरातील कायनेटिक चौकात अहमदनगर शहराला ‘अंबिकानगर’ असं नाव द्यावं, अशी मागणी करणारा फलक लावले आहेत.
याबाबच बोलताना सुमित वर्मा म्हणाले की, आजपासून संभाजीनगरच्या नामांतरणाचा विषय मार्गी लावणार आहे. यापुर्वीपासून आम्ही या शहराचे नाव अंबिकानगर करण्यात यावे, अशी मागणी करत होतो. आज आम्ही फक्त चौकामध्ये नामांतरणाचे फलक लावले, काही दिवसांनंतर ते प्रत्येक ठिकाणी दिसतील.
अहमदनगर शहराच्या स्थापना दिनाच्या दिवशी मनसेने नामांतराचा मुद्दा उचलून धरला. अहमदनगर शहराचे नाव पूर्वी अंबिकानगर असे होते. त्याचे दाखले शिव स्वराज्यात देखील मिळतात. त्यामुळे अहमदनगरचे नाव हे अंबिकानगर झालंच पाहिजे. शहर स्थापना दिनी अंबिकानगर नामकरणाचे फलक लावून आम्ही प्रशासन, राज्य सरकार यांचे लक्ष वेधलं आहे, असे म्हणतानाच सुमित वर्मा यांनी नामांतरासाठी आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला.
Read Also :
- ‘संभाजीराजेंनी पक्ष काढल्यावर मला त्यांच्या पक्षात घेतील का माहिती नाही’
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळच्या कार्यकर्त्यावर गोळीबार
- ‘निलेश लंके ही लढाई आपण सुरु केली, पण आम्हीच संपवणार हे निश्चित’
- ‘अनिल परब फक्त दोन महिन्यांचे पाहुणे’
- ‘महाराष्ट्रातील 12 कोटी नागरिकांच्या लसीकरणासाठी असलेला चेक वठणार कधी?’