मुंबई : कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर बोलतानाच 15 दिवसांसाठी लॉकडाऊन वाढवणार असल्याची माहिती दिली. यावरून आता भाजपकडून टीका करण्यात आली आहे.
राज्यातील 12 कोटी जनतेच्या लसीकरणासाठी एकरक्कमी पैसे देण्याची तयारी असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा सांगितले. यावरून ‘महाराष्ट्रातील 12 कोटी नागरिकांच्या लसीकरणासाठी असलेला चेक वठणार कधी?’ असा सवाल भाजप नेते प्रविण दरेकर यांनी केला आहे.
महाराष्ट्रातील १२ कोटी नागरिकांच्या लसीकरणासाठी असलेला चेक वठणार कधी? हे मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट करणे अपेक्षित असताना, १५ दिवसांसाठी लॉकडाऊन वाढविण्यापलिकडे मुख्यमंत्र्यांच्या संवादात काहीही नव्हतं! pic.twitter.com/p1BSIdDKvK
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) May 30, 2021
मुख्यमंत्र्यांच्या संवादातून 15 दिवस लॉकडाऊन वाढवण्यापलीकडे काहीच नव्हतं. मुख्यमंत्री लसीकरणावर काहीही बोलले नाही. लसीकरणासाठी असलेला 12 कोटी नागरिकांच्या लसीकरणाचा चेक वठणार कधी ? आणि लसी कधी मिळणार ? याविषयी ते काहीही बोलले नाहीत. मराठा, ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत देखील मुख्यमंत्र्यांनी बोलणे टाळले. कोरोनारुग्ण मृत्यूदर कमी होत असल्याने पाठ थोपटून घेत आहेत व दुसरीकडे लॉकडाऊन वाढवला आहे. ही भूमिकेशी विसंगत कृती आहे, अशी जोरदार टीका प्रवीण दरेकरांनी ठाकरे सरकारवर केली.
माझं कुटुंब माझं जबाबदारी म्हणताना कुटुंबावर ढकलून मोकळे झाले. मात्र, राज्याचा मुख्यमंत्री म्हणून सरकार काय करणार आहे ? हे जनता विचारत आहे. सर्व काही तालुका, जिल्ह्यांनी करायचं तर राज्य सरकार काय करणार ? असे प्रश्न उपस्थित करतानाच, या संवादातून जनतेला काही भरीव ऐकायलाच मिळाले नाही, असे दरेकर म्हणाले.
Read Also :
- ‘70 वर्षांत जे कमवलं ते सगळं 7 वर्षात मोदी सरकारने विकायला काढलं’
- 12वीच्या परीक्षांबाबत मुख्यमंत्री ठाकरेंनी पंतप्रधानांकडे केली ‘ही’ मागणी, म्हणाले…
- ‘इकडे फाटलेलं तोंड शिवणारे टेलर आहेत, आणखी जास्त फाटू नये याची काळजी घ्या’
- ‘मोदी सरकार हे आत्तापर्यंतचं देशातील सर्वात आडमुठं अन् अहंकारी’
- ‘सत्तेसाठी आधी हिंदुत्व सोडले आणि आता बाळासाहेबांचे विचारही!’