मुंबई : ‘7 वर्षात मोदी सरकारने 70 वर्षामध्ये जे कमवलं ते सगळं विकायला काढलं आहे’, अशी जोरदार टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या केंद्र सरकारला 7 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने त्यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला.
मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाला 2 वर्ष पूर्ण झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून राज्यभर आंदोलन देखील करण्यात आले. ‘कोरोना काळात WHO ने काही सूचना केल्या होत्या. पण त्या सुचनांकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केलं. त्यामुळे देशात कोरोनाची परिस्थितीत बिकट झाली, असा आरोप देखील त्यांनी केली. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी मोदींवर निशाणा साधला.
मोदींनी आपल्या मनमानी कारभाराने 130 कोटी जनतेला कोरोनाच्या खाईत लोटले, त्यांना सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नसून मोदींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी पटोलेंनी केली.
नाना पटोले म्हणाले की, आज देशात लस मिळत नाही आहे, पण फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये लस दिली जात आहे, मोदी सरकारचे हे धोरणंच आहे सुटा बुटातील हे सरकार आहे, यांना फक्त श्रीमंत लोकांची काळजी आहे का?, असा सवाल देखील त्यांनी केला.
Read Also :
- 12वीच्या परीक्षांबाबत मुख्यमंत्री ठाकरेंनी पंतप्रधानांकडे केली ‘ही’ मागणी, म्हणाले…
- ‘इकडे फाटलेलं तोंड शिवणारे टेलर आहेत, आणखी जास्त फाटू नये याची काळजी घ्या’
- ‘मोदी सरकार हे आत्तापर्यंतचं देशातील सर्वात आडमुठं अन् अहंकारी’
- ‘सत्तेसाठी आधी हिंदुत्व सोडले आणि आता बाळासाहेबांचे विचारही!’
- ‘चंद्रकांत पाटलांना मस्ती आलीये’ – हसन मुश्रीफ