मुंबई : केंद्रातील मोदी सरकारला आज सत्तेत येऊन सात वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर एकीकडे काँग्रेस सरकारविरोधात आंदोलन छेडणार असून, दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत प्रसारमाध्यांशी बोलताना, ‘मोदी सरकारला आजवरच्या कामगिरीकडे बघता, त्यांना आत्मचिंतानाची गरज आहे. हा देश अजूनही काँग्रेसच्याच पुण्याईवर चालत असून, मोदी सरकारला आणखीन मेहनत करायची गरज आहे,’ असं वक्तव्य केलं होतं.
तसेच, “सरकारला ७ वर्षे पूर्ण झाली, ही नक्कीच चांगली बाब आहे. यातली २ वर्षे महामारीमध्ये गेली. मात्र, अभ्यास केला तर हेच दिसतं; की पंतप्रधान नेहरुंपासून ते अगदी आत्ताच्या मनमोहन सिंग यांच्यापर्यंत, अजूनही हा देश काँग्रसेच्याच पुण्याईवर चालत आहे. त्यांनी सुरु केलेल्या आणि यशस्वीपणे राबवलेल्या योजनांचा उपभोग आपण आजही घेत आहोत,’ अशी टीका देखील त्यांनी भाजपवर केली होती.
शिवसेनाप्रमुख मा. #बाळासाहेब_ठाकरे यांचे विचार शिवसेनेने पूर्ण सोडून दिले यांचे उदाहरण म्हणजे @rautsanjay61 यांची ही विधाने. देशांतील समस्यांबाबत काँग्रेसवर बाळासाहेब प्रखर टीका करायचे. आज काँग्रेसच कौतुक राऊत करीत आहेत. सत्तेसाठी हिंदुत्वानतंर बाळासाहेबांचेविचार ही सोडले pic.twitter.com/JPlHQrN2v1
— Keshav Upadhye (@keshavupadhye) May 30, 2021
दरम्यान, त्यांच्या या टीकेचा समाचार भाजपकडून चंद्रकांत पाटील यांच्यासोबतच, प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी देखील घेतला असून, त्यांनी ट्विट करून, “शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार शिवसेनेने पूर्ण सोडून दिले यांचे उदाहरण म्हणजे, संजय राऊत यांची ही विधाने. देशांतील समस्यांबाबत काँग्रेसवर बाळासाहेब प्रखर टीका करायचे. आज काँग्रेसच कौतुक राऊत करीत आहेत. सत्तेसाठी हिंदुत्वानतंर बाळासाहेबांचेविचार ही सोडले,” असा जोरदार हल्लाबोल त्यांनी संजय राऊत यांच्यावर केला आहे.
Read Also :
- ‘चंद्रकांत पाटलांना मस्ती आलीये’ – हसन मुश्रीफ
- ‘नव्या भारताचा पाया’ : एकीकडे पुलवामातील शहिदांचा राजकीय वापर; दुसरीकडे गंगेत वाहणारी प्रेतं आणि चितांचा धूर
- ‘निळ्या डोळ्यांच्या मुलासाठी मातोश्रीचं प्रेम इतकं का ऊतू जात आहे?’
- पेट्रोलचा दर पाहून तरुण चक्कर येऊन पडले; पेट्रोल विरोधात नागपूर मध्ये आगळ वेगळं आंदोलन
- आज रात्री ८:३० वा. मुख्यमंत्र्यांचा जनसंवाद; लॉकडाऊनबाबत आज निर्णय