मुंबई : राज्यात काही दिवसांपासून बाधित रुग्णसंख्येमध्ये सातत्याने घट होताना दिसत आहे. त्यामुळे काही ठिकाणी राज्य सरकार निर्बंधांमध्ये शिथिलता देण्याच्या विचारात असून, काही ठिकाणी मात्र, लॉकडाऊन वाढवण्यात येणार आहे, असं सांगितलं जात आहे.
या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री साडे आठ वाजता फेसबुक दूरदृश्य प्रणालीद्वारे जनतेशी संवाद साधणार असून, यामध्ये ते नेमकी काय भूमिका मांडणार? नक्की कुठल्या जिल्ह्यांना निर्बंधांमध्ये दिलासा मिळणार आणि कुठे नियम कडक होणार?, तसेच हे नियम काय असणार याकडे राज्यातील जनतेचं आता लक्ष लागून आहे.
तसेच, राज्यातला लॉकडाऊन एकूण ४ टप्प्यांमध्ये उठविण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. यात पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात साधी दुकाने उघडली जातील, नंतर तिसऱ्या टप्प्यात हॉटेल, रेस्टॉरंटस, बार आणि मद्यविक्रीची दुकाने आणि मग शेवटच्या चौथ्या टप्प्यात लोकल सेवा आणि सर्व धार्मिक स्थळे सुरु केली जातील. तसेच, जिल्हाबंदी देखील परिस्थिती पाहून उठवली जाण्याची शक्यता आहे.
यावेळी ते राज्यातील लसीकरण मोहिम, महामारीच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने बालकांना असलेला धोका यासंबंधी देखील संवाद साधण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने ते काय घोषणा करणार हे देखील पाहणं महत्वाचं आहे. याचसोबत मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि इतर महत्वाच्या विषयांचा अंतर्भाव ते आपल्या संवादात करणार का? ते यावर काय भूमिका मांडणार याकडे देखील जनतेचे लक्ष असेल.
Read Also :
- ‘…तर बाळासाहेब ठाकरे वरून तुमच्या थोबाडीत मारतील!’
- गाढ झोपलेल्या ठाकरे सरकारला उठवण्यासाठी, ओबीसींना आंदोलन करावंच लागेल!
- अनिल परब यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाची होणार चौकशी.
- ‘अजितदादा सांभाळून बोला! मी फाटक्या तोंडाचा आहे, बोलायला लागलो तर महागात पडेल!’
- ‘सरकारला फक्त अल्टिमेटम देऊ नका! सर्व मराठा संघटनांना एकत्र आणा’