मुंबई : केंद्रातील मोदी सरकारला आज सत्तेत येऊन सात वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर एकीकडे काँग्रेस सरकारविरोधात आंदोलन छेडणार असून, दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील मोदी सरकारच्या आजपर्यंतच्या कामगिरीवर हल्लबोल केला आहे.
‘मोदी सरकारला आजवरच्या कामगिरीकडे बघता, त्यांना आत्मचिंतानाची गरज आहे. हा देश अजूनही काँग्रेसच्याच पुण्याईवर चालत असून, मोदी सरकारला आणखीन मेहनत करायची गरज आहे,’ असं वक्तव्य त्यांनी प्रसारमाध्यांशी बोलताना केलं आहे.
दरम्यान, त्यांच्या या वक्तव्याचा भाजा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तीव्र शब्दांत संचार घेतला असून, आज कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना, “संजय राऊत यांनी जरा हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटो समोर डोळे मिटून शांतपणे बसावं आणि विचारावं तुमचंही हेच मत आहे का? त्यांना बाळासाहेब ठाकरे हे वरून थोबाडीत मारतील’ अशी विखारी टीका त्यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.
“संजय राऊत हे नेहमी काही बाही बरळत असतात, कुणी किती बोलावं याला काही मर्यादा असतात की नाही?,” अशी टीका देखील त्यांनी ‘सामना’चे संपादक असलेल्या संजय राऊत यांच्यावर केली आहे.
Read Also :
- ‘औरंगजेबाला स्वप्नात शिवाजी महाराज दिसायचे, चंद्रकांतदादांना अजित पवार दिसतात’
- गाढ झोपलेल्या ठाकरे सरकारला उठवण्यासाठी, ओबीसींना आंदोलन करावंच लागेल!
- ‘ओबीसी आरक्षणप्रश्नी आता केंद्रानेच हस्तक्षेप करावा!’
- अनिल परब यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाची होणार चौकशी.
- केंद्राकडून अजित पवारांवर मोठी जबाबदारी!