मुंबई : मराठा आरक्षणावरुन कात्रीत सापडलेल्या आघाडी सरकारला, सर्वोच्च न्यायालयाने आणखीन एक झटका दिला असून, न्यायालयाने ठाकरे सरकारची स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुकीत अतिरिक्त ओबीसी आरक्षणाची फेरविचार याचिका फेटाळली आहे. यामुळे आता ग्रामपंचायत, जिल्हापरिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसींना मिळणारे राजकीय आरक्षण पूर्णपणे संपुष्टात आले असून, हा ठाकरे सरकारसाठी मोठा झटका समजला जात आहे.
या पार्श्वभूमीवर, भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना, “राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे गाढ झोपलं आहे. त्यांच्या बेफिकीर कारभारामुळेच ओबीसींचं आरक्षण गेलं. त्यामुळे आता या सरकारला झोपेतून उठवण्यासाठी राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे,’ अशी घोषणा त्यांनी केली आहे.
तसेच, देवेंद्र फडणवीसांनी लोकसंख्येच्या आधारावरच ओबीसींना आरक्षण मिळवून दिलं. मात्र, आघाडीच्या नेत्यांनी आणि मंत्र्यांनी त्याकडे आरक्षणाकडे लक्ष दिलं नाही. तसेच, सर्वोच्च न्यायालयाच्या दिलेल्या सूचनांकडेही त्यांनी दुर्लक्ष केलं. यामुळेच ओबीसींचं आरक्षण गेलं,” असा आरोप त्यांनी ठाकरे सरकारवर केला आहे.
यावेळी, प्रत्येक वेळी, प्रत्येक मुद्द्यावरून केंद्र सरकारकडे बोट दाखवू नका. या आरक्षणाच्या मुद्द्याचा केंद्राशी काही संबंध येत नाही. हा विषय सर्वस्वी राज्याचा आहे. ठाकरे सरकार खोटं बोलत आहे. त्यांनी तातडीने प्रदा (डेटा) तयार करावा, एक महिन्यात आयोगाची स्थापन करून, ३ महिन्यांत तो सुप्रीम कोर्टात दाखल करावा,” अशीही मागणीही त्यांनी केली आहे.
Read Also :