मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सरकारविरोधात खळबळजनक वक्तव्य केले होते. “देवेंद्र फडणवीस मध्यंतरी म्हणाले होते, “झोपेतून उठलो तर सरकार गेलं होतं, इतका विश्वासघात झाला. केसाने गळाने कापतात म्हणतात ते हे. तुम्ही सरकार कधी पडणार विचारत आहात, मी सांगतो की, असेच सगळे झोपेत असतील तेव्हा हे सरकार पडेल आणि कुणाला कळणारच नाही आघाडी सरकार कधी गेलं,” असा दावा त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला होता.
त्यांच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, “ज्या दिवसापासून राज्यात आघाडी सरकार आलं आहे, तेव्हापासून भाजप नेत्यांना आपण सरकारमध्ये नाही, ही भावना सतत बोचत आहे, त्यांना असह्य होत आहे. कार्यकर्त्यांनी पक्षासोबत रहावं यासाठी ते काही बाही बोलत राहतात. आघाडी सरकार, तिन्ही पक्षाचे नेते निर्णय घेत नाहीत तोवर राहणार,” असं प्रत्युत्तर दिलं.
दरम्यान, आज कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर जोरदार शाब्दिक प्रतिहल्ला केला असून, “झोपेत असताना सरकार कसं आणायचं, हे अजितदादांना चांगलचं माहिती आहे. स्वतः शरद पवार झोपेत असताना त्यांनी राज्यात सरकार आणलं होतं, याचा त्यांना विसर पडला आहे का?,’ असा संतप्त सवाल त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना केला आहे.
तसेच, “ज्यांच्या मांडीला मांडी चिकटवून तुम्ही, राज्यात ३ दिवसांचं का होईना; पण सरकार स्थापन केलं होतं. त्यांच्यावरच टीका करताना, जरा तरी विचार करा. अजितदादा सांभाळून बोला! कसं आहे, मी फाटक्या तोंडाचा आहे, बोलायला लागलो तर तुम्हाला खूप महागात पडेल,” अशा शब्दांत त्यांनी अजित पवारांना इशारा दिला आहे.
Read Also :
- ‘आत्तापर्यंत नेहरूंच्या पुण्याईवरच देश चालतोय!’
- ‘सरकारला फक्त अल्टिमेटम देऊ नका! सर्व मराठा संघटनांना एकत्र आणा’
- ‘हा आमच्या नाही, फडणवीस सरकारच्या नाकर्तेपणाचा परिणाम!’
- १०० कोटींची महावसुली आता ३०० कोटींवर? गृहमंत्रीसाहेब निष्पक्ष चौकशी करा!
- ‘सत्तेसाठी मती गेली’, आम्ही अजूनही हिंदुत्व सोडले नाही, असे तरी आता कोडगेपणाने सांगू नका