मुंबई : दीड वर्षांपासून सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारमागचे शुक्लकाष्ठ काही केल्या संपायचे नाव घेत नाहीये. आता राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभागात पैश्यांची मोठ्या प्रमाणावर अफरातफर झाल्याचा आरोप करण्यात आला असून, ठाकरे सरकारच्या अडचणींमध्ये त्यामुळे अजून वाढ झाली आहे. नाशिक मधील आरटीओतील वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी हा आरोप केला असून, यामध्ये त्यांनी शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासह राज्यातील इतर ६ बड्या अधिकाऱ्यांची नावे घेतली आहेत.
या प्रकरणी निलंबित आरटीओ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी, परिवहन मंत्री अनिल परब आणि आरटीओमधील या ६ वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात, नाशिकमधील पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, आरटीओ खात्यात पदोन्नतीसाठी, तसेच इतर व्यवहारात आर्थिक भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप त्यांनी दाखल केलेल्या या तक्रारीत केला आहे. तसेच, आरटीओ अधिकाऱ्यांच्या मदतीने ३०० कोटी रुपयांचा बदलीचा मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी या तक्रारीत केला आहे.
दरम्यान, या मुद्द्यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करून राज्य सरकार आणि मंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला असून, हे प्रकरण गंभीर असल्याचं सांगत त्यांनी, “१०० कोटी महावसूली आता ३०० कोटीवर ? परिवहन मंत्री परब यांच्या विभागाचे अधिकारी पाटील यांची नाशिक पंचवटी पोलिस स्टेशनात तक्रार, गृहमंत्री वळसे पाटील किमान निष्पक्ष चौकशी करणार का????,” असा सवाल उपस्थित केला आहे.
१०० कोटी महावसूली आता ३०० कोटीवर ? परिवहन मंत्री परब यांच्या विभागाचे अधिकारी पाटील यांची नाशिक पंचवटी पोलिस स्टेशनात तक्रार, गृहमंत्री वळसे पाटील किमान निष्पक्ष चौकशी करणार का????
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) May 29, 2021
Read Also :
- शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप
- पॅनेल प्रमुखांच्या डोकेदुखीत वाढ: भोसले गट आणि जयंत पाटील गट यांची जवळीक आणखी वाढते की काय?
- ‘कोरोना संकटात मयताच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या काही औलादी आहेत’
- ‘चंद्रकांत पाटील जागेपणी बोलले की ते झोपेत होते?’
- भाजपच्या आमदाराने दाखल केला, थेट मुख्यमंत्र्यांच्या विरोधातच हक्कभंगाचा प्रस्ताव