मुंबई : दीड वर्षांपासून सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारमागचे शुक्लकाष्ठ काही केल्या संपायचे नाव घेत नाहीये. घटक पक्षाच्या काही नेत्यांवर करण्यात आलेले गंभीर आरोप, सीबीआय, ईडी, एनआयकडून सुरु असलेल्या काही नेत्यांच्या चौकश्या, पोलीस दलामध्ये असलेली नाराजी, महामारीचे संकट, त्यात आलेले चक्रीवादळासारखे अस्मानी संकट, उजनी पाणी प्रश्न आणि आता मागासवर्गीयांच्या पदन्नोतेतील आरक्षणाचा, तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकार पुरते अडचणीत सापडले आहे.
यातच आता राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभागात पैश्यांची मोठ्या प्रमाणावर अफरातफर झाल्याचा आरोप करण्यात आला असल्याने, ठाकरे सरकारच्या अडचणींमध्ये अजून वाढ झाली आहे. नाशिक मधील आरटीओतील वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी हा आरोप केला असून, यामध्ये त्यांनी शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासह राज्यातील इतर ६ बड्या अधिकाऱ्यांची नावे घेतली आहेत.
या प्रकरणी निलंबित आरटीओ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी, परिवहन मंत्री अनिल परब आणि आरटीओमधील या ६ वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात, नाशिकमधील पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, आरटीओ खात्यात पदोन्नतीसाठी, तसेच इतर व्यवहारात आर्थिक भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप त्यांनी दाखल केलेल्या या तक्रारीत केला आहे. तसेच, आरटीओ अधिकाऱ्यांच्या मदतीने ३०० कोटी रुपयांचा बदलीचा मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी या तक्रारीत केला आहे.
Read Also :
- पॅनेल प्रमुखांच्या डोकेदुखीत वाढ: भोसले गट आणि जयंत पाटील गट यांची जवळीक आणखी वाढते की काय?
- ‘कोरोना संकटात मयताच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या काही औलादी आहेत’
- ‘चंद्रकांत पाटील जागेपणी बोलले की ते झोपेत होते?’
- अहमदनगर मध्ये पुन्हा एकदा एसपी ऑफिस हल्ला प्रकरणाची पुनरावृत्ती ; समर्थकांमध्ये जोरदार खडाजंगी
- भाजपच्या आमदाराने दाखल केला, थेट मुख्यमंत्र्यांच्या विरोधातच हक्कभंगाचा प्रस्ताव