मुंबई : दीड वर्षांपासून सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारमागचे शुक्लकाष्ठ काही केल्या संपायचे नाव घेत नाहीये. घटक पक्षाच्या काही नेत्यांवर करण्यात आलेले गंभीर आरोप, सीबीआय, ईडी, एनआयकडून सुरु असलेल्या काही नेत्यांच्या चौकश्या, पोलीस दलामध्ये असलेली नाराजी, महामारीचे संकट, त्यात आलेले चक्रीवादळासारखे अस्मानी संकट, उजनी पाणी प्रश्न आणि आता मागासवर्गीयांच्या पदन्नोतेतील आरक्षणाचा, तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकार पुरते अडचणीत सापडले आहे.
दरम्यान, या मुद्द्यांवरून मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधली धुसफूस आणि घटक पक्षांमधल्या कुरबुरी वाढल्या असून, राज्यातले सरकार लवकरच गडगडणार असल्याच्या अफवांना राजकीय वर्तुळात पेव फुटले आहे. यातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सरकारविरोधात खळबळजनक वक्तव्य केले होते.
“देवेंद्र फडणवीस मध्यंतरी म्हणाले होते, “झोपेतून उठलो तर सरकार गेलं होतं, इतका विश्वासघात झाला. केसाने गळाने कापतात म्हणतात ते हे. तुम्ही सरकार कधी पडणार विचारत आहात, मी सांगतो की, असेच सगळे झोपेत असतील तेव्हा हे सरकार पडेल आणि कुणाला कळणारच नाही आघाडी सरकार कधी गेलं,” असा दावा चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी ते बोलताना केला होता.
त्यांच्या या वक्तव्याचा आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाचार घेतला असून, आज बारामतीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी, “ज्या दिवसापासून राज्यात आघाडी सरकार आलं आहे, तेव्हापासून भाजप नेत्यांना आपण सरकारमध्ये नाही, ही भावना सतत बोचत आहे, त्यांना असह्य होत आहे. कार्यकर्त्यांनी पक्षासोबत रहावं यासाठी ते काही बाही बोलत राहतात. आघाडी सरकार, तिन्ही पक्षाचे नेते निर्णय घेत नाहीत तोवर राहणार,” असं प्रत्युत्तर त्यांनी चंद्रकांत पाटलांना दिलं आहे.
Read Also :
- अहमदनगर मध्ये पुन्हा एकदा एसपी ऑफिस हल्ला प्रकरणाची पुनरावृत्ती ; समर्थकांमध्ये जोरदार खडाजंगी
- भाजपच्या आमदाराने दाखल केला, थेट मुख्यमंत्र्यांच्या विरोधातच हक्कभंगाचा प्रस्ताव
- क्या हुआ, तेरा वादा.. जयंतरावजी…; चित्रा वाघकडून जुन्या आठवणींना उजाळा
- स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द; सुप्रीम कोर्टाचा ठाकरे सरकारला झटका
- अविनाश मोहिते पाठोपाठ इंद्रजित मोहितेंचाही एकला चालो रे चा संदेश