मुंबई : राज्य सरकारने चंद्रपूरची दारुबंदी उठवली आहे. त्यावरून राज्य सरकारवर टीका होत असतानाच आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना त्यांच्या जुन्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे. यवतमाळमधील दारुबंदीचं काय झालं? क्या हुआ तेरा वादा…जयंतरावजी, असा खोचक सवाल चित्रा वाघ यांनी पाटील यांना केला आहे.
क्या हुवा तेरा वादा….जयंतराव जी
सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेटला यवतमाळला दारूबंदी करणार…..इस आश्वासन का…
यवतमाळ राहिलं दूर..चंद्रपुरची दारूबंदी उठवली तुमच्या सरकारने
महिलांना कमी समजू नका अजूनही आमच्या भावनांशी असचं खेळत राहिलात तर तुम्हाला घरी बसून चुल फुंकायची वेळ येईल pic.twitter.com/okq3isGvmO
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) May 29, 2021
चित्रा वाघ यांनी ट्विट करून जयंत पाटील यांना त्यांच्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे. सोबत त्यांनी विधानसभेतील जयंत पाटलांच्या भाषणाचा व्हिडीओही पोस्ट केला आहे. क्या हुवा तेरा वादा….जयंतरावजी. सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेटला यवतमाळमध्ये दारूबंदी करणार…..इस आश्वासन का, असा टोला चित्रा वाघ यांनी लगावला आहे.
यवतमाळ राहिलं दूर. चंद्रपूरची दारुबंदी उठवली तुमच्या सरकारने. महिलांना कमी समजू नका. अजूनही आमच्या भावनांशी असचं खेळत राहिलात तर तुम्हाला घरी बसून चूल फुंकायची वेळ येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.