मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या सातत्याने महाविकास आघाडीतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. आता किरीट सोमय्या यांनी मोठं वक्तव्य करत परिवहन मंत्री अनिल परब हे केवळ दोन महिन्यांचे पाहुणे आहेत. त्यांची मंत्रिमंडळातील गच्छंती अटळ आहे, असा दावा त्यांनी केला आहे.
अनिल परब यांच्याविरोधात एसटी महामंडळ तिकीट घोटाळा, म्हाडाची जमीन लंपास करणे, दापोलीला अनधिकृत 10 कोटींचा रिसॉर्ट बांधणे, आरटीओ ट्रान्सफर घोटाळा, सचिन वाझेचे मुंबई महापालिका कॉन्ट्रॅक्टर घोटाळा, भेंडी बाजारमधील मोठा री-डेव्हलपमेंट प्रकल्प 50 कोटींचा घोटाळा अशा अनेक चौकशी सुरू असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.
सोमय्या म्हणाले की, परब यांच्यावर वेगवेगळ्या घोटाळ्याचे आरोप आहेत. या सगळ्या घोटाळ्यांची विविध यंत्रणांमार्फत चौकशी सुरू असून राज्यपालांनीही परब यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे परब हे आता 2 महिन्यांचे पाहुणे असून सरकारनेच आता त्यांच्यावर कारवाई करावी, असी मागणी त्यांनी केली.
ठाकरे सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. अंतर्गत मतभेदामुळे ठाकरे सरकारने मराठा आरक्षणाची बाजू कोर्टात व्यवस्थित मांडली नाही. त्यामुळे मराठा समाजाचं आरक्षण गेलं, असा आरोप देखील सोमय्या यांनी केला.
Read Also :
- ‘महाराष्ट्रातील 12 कोटी नागरिकांच्या लसीकरणासाठी असलेला चेक वठणार कधी?’
- ‘70 वर्षांत जे कमवलं ते सगळं 7 वर्षात मोदी सरकारने विकायला काढलं’
- 12वीच्या परीक्षांबाबत मुख्यमंत्री ठाकरेंनी पंतप्रधानांकडे केली ‘ही’ मागणी, म्हणाले…
- ‘इकडे फाटलेलं तोंड शिवणारे टेलर आहेत, आणखी जास्त फाटू नये याची काळजी घ्या’
- ‘मोदी सरकार हे आत्तापर्यंतचं देशातील सर्वात आडमुठं अन् अहंकारी’