मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला अल्टिमेटम देत आंदोलनाचा इशारा दिला आहे. आक्रमक भूमिका घेतलेल्या संभाजीराजे यांनी थेट ट्विट करत सरकार माझी हेरगिरी करत असल्याचा गंभीर आरोप केला होता. यावर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी संभाजीराजेंची हेरगिरी प्रश्नच येत नसल्याचे म्हटले आहे.
सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे.
माझी हेरगिरी करण्याचा नेमका उद्देश माहीत नाही.
पण मला हेच लक्षात येत नाहीये की माझ्यासारख्या सरळ आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या एका कार्यकर्त्यावर हेरगिरी करून काय साध्य होणार आहे?
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) May 31, 2021
संभाजीराजे ट्विट करत म्हणाले होते की, सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे. माझी हेरगिरी करण्याचा नेमका उद्देश माहीत नाही. पण मला हेच लक्षात येत नाहीये की माझ्यासारख्या सरळ आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या एका कार्यकर्त्यावर हेरगिरी करून काय साध्य होणार आहे?, असा सवाल त्यांनी केला होता.
छत्रपती संभाजी राजेंवर पाळत ठेवण्याचा किंवा हेरगिरी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ते राज्यभर करत असलेल्या दौऱ्यांदरम्यान कोणतीही सामाजिक अपप्रवृत्ती त्यांच्या कार्यक्रमात विघ्न आणू नये म्हणून पुरेसा बंदोबस्त सिंधुदुर्ग दौऱ्यात नेमण्यात आला होता.@YuvrajSambhaji pic.twitter.com/hePs7QxTtJ
— Dilip Walse Patil (@Dwalsepatil) May 31, 2021
त्यांच्या या ट्विटनंतर आता गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी त्यांच्याशी फोनवरून संवाद साधला. छत्रपती संभाजी राजेंवर पाळत ठेवण्याचा किंवा हेरगिरी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ते राज्यभर करत असलेल्या दौऱ्यांदरम्यान कोणतीही सामाजिक अपप्रवृत्ती त्यांच्या कार्यक्रमात विघ्न आणू नये म्हणून पुरेसा बंदोबस्त सिंधुदुर्ग दौऱ्यात नेमण्यात आला होता. यासंदर्भात माझी संभाजी राजेंशी चर्चा झालेली आहे आणि त्यांचा गैरसमज पूर्णपणे दूर झालेला आहे, असे वळसे पाटील ट्विट करत म्हणाले.
आताच गृह मंत्र्यांचा फोन आला होता.
त्यांनी सांगितले, खालच्या कर्मचाऱ्यांची बैठकी चे ठिकाणी आत जिल्हाधिकारी चेंबर मध्ये येण्याची चूक झाली.
परंतु त्यांचा उद्देश हेरगिरीचा नव्हता.
माझ्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी तसे केले असावे.
(१/२)
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) May 31, 2021
खासदार संभाजीराजे यांनी देखील यानंतर ट्विट करत हा विषय संपल्याचे म्हटले आहे. आताच गृह मंत्र्यांचा फोन आला होता. त्यांनी सांगितले, खालच्या कर्मचाऱ्यांची बैठकीचे ठिकाणी आत जिल्हाधिकारी चेंबर मध्ये येण्याची चूक झाली. परंतु त्यांचा उद्देश हेरगिरीचा नव्हता. माझ्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी तसे केले असावे. मी सुद्धा त्यांच्या या वक्तव्यावर समाधानी असून. हा विषय संपला असल्याचे म्हणत त्यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला.
Read Also :
- मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलेल्या ‘त्या’ सरपंचांनी गाव कोरोनामुक्त कसे केले ? वाचा
- अहमदनगरच्या नामांतरासाठी मनसे आक्रमक, केली ‘हे’ नाव देण्याची मागणी
- ‘संभाजीराजेंनी पक्ष काढल्यावर मला त्यांच्या पक्षात घेतील का माहिती नाही’
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळच्या कार्यकर्त्यावर गोळीबार
- ‘निलेश लंके ही लढाई आपण सुरु केली, पण आम्हीच संपवणार हे निश्चित’