मुंबई : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सरकारने कडक निर्बंध लावलेले आहेत. गेल्या काही दिवसात शहरातील रुग्णसंख्या कमी होत चालल्या दिसून येत आहे, तर ग्रामीण भागातून चिंता वाढवणारी आकडेवारी समोर येत आहे. या संकटात उत्तम कार्य करत गाव कोरोनामुक्त करणाऱ्या सरपंचांचे कौतुक मुख्यमंत्री ठाकरेंनी देखील केले.
‘हिवरे बाजार सारखा प्रयत्न राज्यातील काही सरपंच व गावे करीत आहेत. मी त्यांचेही कौतुक करतो. पोपटराव पवार, ऋतुराज देशमुख, कोमल ताई यांच्यासारखे सरपंच एक उदाहरण घालून देत आहेत. मी त्यांच्याशी बोलतो आहे. आज कोविडला रोखण्यात जसे वैद्यकीय उपचारांचे महत्व आहे तसेच लोकांची जागृती आणि सहभागही फार महत्वाचा आहे, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी या सरपंचांचे कौतुक केले.
हिरवेबाजाराची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील घेतली. याबाबत बोलताना उपसरपंच पोपटराव पवार यांनी याचे श्रेय लोकांचे शिस्त आणि ट्रेसिंगला दिले आहे. लोकांच्या स्वच्छतेच्या शिस्तीमुळे हे यश मिळाले. हगणदारीमुक्त याप्रमाणे आता आम्ही कोरोनामुक्त झालो आहोत. मार्च महिन्यात गावात पहिला रुग्ण आढळला त्यानंतर एप्रिलमध्ये रुग्णसंख्या एकदम वाढली. त्यानंतर 4 टीम करून सर्वेक्षण केले. या टीमनेच सर्वेक्षण, टेस्टिंग आणि रुग्णांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्याचे काम केल्याचे त्यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यातील कोमल करपे या युवा सरपंचांचे देखील मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. कोमल या दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी गावच्या सरपंच आहेत. अंत्रोळी गावची लोकसंख्या 2 हजार 298 इतकी आहे. यातील जवळपास 300 जणांचे लसीकरण झाले आहे. ट्रेसिंग, टेस्टींग आणि ट्रीटमेंट या त्रिसुत्रीद्वारे त्यांनी गावाला कोरोनामुक्त केले.
मुख्यमंत्र्यांनी सोलापूर जिल्ह्यातील घाटणे येथील तरुण सरपंच ऋतुराज देशमुखचे देखील कौतुक केले. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये त्याची सरपंचपदी निवड झाली. बी पॉझिटिव्ह, आपले गाव ठेवू कोरोना निगेटिव्ह’ ही मोहीम राबवत गावाला कोरोनामुक्त केले. नियमांचे पालन, लसीकरण, ट्रेसिंग आणि उपचार या गोष्टींवर भर देत या सरपंचांनी गावाला कोरोनामुक्त केले.
Read Also :
- अहमदनगरच्या नामांतरासाठी मनसे आक्रमक, केली ‘हे’ नाव देण्याची मागणी
- ‘संभाजीराजेंनी पक्ष काढल्यावर मला त्यांच्या पक्षात घेतील का माहिती नाही’
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळच्या कार्यकर्त्यावर गोळीबार
- ‘निलेश लंके ही लढाई आपण सुरु केली, पण आम्हीच संपवणार हे निश्चित’
- ‘अनिल परब फक्त दोन महिन्यांचे पाहुणे’