मुंबई : दिल्लीतील निर्भया सारखीच संतापजनक आणि लाजिरवाणी अशी घटना मुंबईतील साकीनाका मध्ये घडली आहे. अमानुष अत्याचाराला सामोरे जावं लागलेल्या पीडितेवर, घटनेनंतर तीन दिवस मुंबई महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात पीडितेवर उपचार सुरू होते. अतिरक्तस्त्रावामुळे तिची प्रकृती अतिशय चिंताजनक होती. मात्र आज अखेर मृत्यूशी सुरु असलेली तिची झुंज अपयशी ठरली असून तिचा दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेनंतर रुग्णालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
‘महिला आणि बालविकासमंत्री असा विचार करतात, याची मला लाज वाटली!’
दरम्यान, यावरून आता विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आले असून, भाजपच्या जोरदार टीकेनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना झापलं आहे. ‘साकीनाक्यातील दुर्देवी घटनेचं राजकारण करणं विरोधकांनी थांबवलं पाहिजे. असं करणं म्हणजे मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार आहे,’ असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. तसेच, ‘या घटनेनंतर माणसं जमवण्याचे प्रकार सुरू आहेत, ते टाळले पाहिजेत,’ असं सांगत, ‘आरोपींना कठोर शासन होईल,’ असा विश्वास दर्शवला आहे.
मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा – नवाब मलिक
तसेच, ‘अजूनही मुंबई महिलांसाठी कायम सुरक्षित आहे. पण या घटनेवरुन राजकारण करून, गोंधळ उडवून सरकारवर चिखलफेक करण्याचं काम विरोधकांनी करू नये. अशाप्रकारच्या घटना राज्याची मान नक्कीच खाली घालायला लावतात,’ असं म्हणत, ‘पोलिसांना पीडित महिलेचा जबाब नोंदवता आला असता, तर गोष्टी बाहेर आल्या असत्या. मात्र सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून त्यांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे,’ असं ते म्हणाले.
‘महाराष्ट्रातल्या महिलांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका!’ चित्रा वाघ यांची संतप्त प्रतिक्रिया
‘राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या सर्वांनी घटनेचा निषेध नोंदवला आहे. आरोपींना फाशीही असेल, ती शिक्षा मिळावी. ती होण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवला पाहिजे. मुख्यमंत्री मागणी मान्य करतील. घटनेची तुलना निर्भया प्रकरणाशी केली जात आहे. हरकत नाही. एका महिलेने जीव गमावला आहे. जीवनाची विटंबना झाली आहे. पण अशा दुर्देवी घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून राज्य सरकार कठोर पावलं उचलल्या शिवाय राहणार नाही,’ अशी भूमिका त्यांनी मांडली.
Read Also :
- आतडे कापले, प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकला; मुंबईच्या साकीनाक्यातील बलात्कार पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी
- आमदार समाधान दादा, आम्ही खड्डयात चाललोय, आमची पिडा दुर करा: शालेय मुलीचं आवताडेंना पत्र
- महाविकास आघाडी सरकार स्थिर की अस्थिर? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
- धनंजय मुंडे, करुणा शर्मांचे फोटो टाकून FB वर बदनामीकारक पोस्ट; फडणवीस, पवारांबद्दल अश्लिल ‘मजकूर’
- पन्नास वर्षे झाली, सत्ता शरद पवारांच्या घरात पाणी भरते; भाजप आमदाराची बोचरी टीका