पुणे : भाजप राज्यात वाढण्यात खरा वाटा स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा आहे. त्यांच्या काळात भाजपचे मुख्यमंत्री झाले नाही तर मनोहर जोशी हे मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्रच्या जनतेने बाळासाहेबांना शक्ती दिली. बाळासाहेबांचा स्वभाव होता की जो सहकारी असेल त्याला साथ द्यायची. मात्र ज्या सहकाऱ्याला साथ दिली. त्यानेच हळूहळू ज्यांनी आपल्याला मोठे केले त्यांना बाजूला केले. देशाच्या इतिहासात कधी पाहिले नाही की निवडणूक आयोगाने एखादा पक्ष, त्याची निशाणी या सगळ्या गोष्टी दुसऱ्याला देऊन टाकल्या. पण हे घडलं. हे सर्व भाजपच्या नेत्यांनी घडवलं. असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. चिंचवड पोटनिवडणुकीसाठी नाना काटे यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची सभा पार पडली त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा…चंद्रकांत पाटलांचं पोटनिवडणुकांबाबत सूक्ष्म नियोजन, थेट घरात जाऊन रासनेंचा प्रचार
आज मत मागण्यासाठी आम्ही येतोय त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ही नवी राजकीय संस्कृती देशाच्या लोकशाहीसाठी घातक आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी संघटना उभी केली. शिवसेनेचा अर्थ बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने उभी झालेली संघटना! आज ही संघटना कोणी चालवायची याबद्दल बाळासाहेबांनी सांगितले होते की संघटेनेचे नेतृत्व उद्धव ठाकरे करतील. भाजपमधील काही लोकांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांचे पद काढून घेतले आणि शिवसेनेमधून काही पन्नास आमदार बाहेर पडून त्यांनी संपूर्ण राज्याची सत्ता हातात घेतली. आता शिवसेना आमचीच असे ते सांगत आहेत. राजकारणात इतकी फसवेगिरी कधी नव्हती, ती अलीकडच्या काळात आली आहे. असा आरोपही शरद पवारांनी केला आहे.
हेही वाचा..“कसब्यात हेमंत रासनेंचा विजय निश्चित, उदयन राजेंचा मतदारांवर विश्वास”
तसेच पुढे बोलतांना ते म्हणाले की, आता जरी मी निवडणूक लढवत नसलो तरी महाराष्ट्रात जर चुकीच्या प्रवृत्ती वाढत असतील आणि उद्धव ठाकरे यांच्यासारख्या सरळमार्गी नेत्याला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होत असेल तर स्वस्थ बसून चालणार नाही. असं करणाऱ्या लोकांना त्यांची योग्य जागा दाखवली पाहीजे. ही संधी आज आली आहे. आज हिंजवडीसारखा परिसर पाहिला तर हजारो लोक याठिकाणी आयटी क्षेत्रात काम करतात. पुणे आणि परिसर संपूर्ण जगाशी संपर्क ठेवण्यात यशस्वी झाला आहे. शिक्षणाचे माहेरघर असलेले पुणे आता आयटीचे, नव्या कारखानदारीचे माहेरघर झाले आहे. अशाच पद्धतीने हा सर्व भाग आपल्याला बदलायचा आहे. त्यासाठी विचारी नेतृत्व आणले पाहीजे. त्याकरता जे प्रयत्न सुरु आहेत त्यामागे तुमची शक्ती उभी करून महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याचे काम आपल्याला करायचे आहे. चिंचवड विधानसभेत नाना काटे यांना यासाठी मोठ्या मतांनी विजयी करा. असं आवाहनही त्यांनी मतदारांना केलं आहे.
Read also
- हेही वाचा…“शिट्टी ला बॅट ने उत्तर,” चिंचवडमध्ये अपक्षांनी अपक्षाला धो धो धुतलं
- हेही वाचा..विरोधकांना संपवण्याचा सत्ताधारी पक्षांचा डाव आहे का? शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडला
- हेही वाचा..“सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षाची ‘सर्वोच्च’ सुनावणी”,ठाकरेंच्या वकिलांनी शिंदेंना अडचणीत पकडले
- हेही वाचा.“नेता नाही तर बेटा म्हणून काम करण्याची इच्छा”, अपक्ष उमेदवार सिद्धिक शेख
- हेही वाचा..सोसायटीधारकांसाठी भाजपाचे ‘रेड कार्पेट’ : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘मायक्रो कॅम्पेनिंग’