मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचले आहेत. सह्याद्री अतिथीगृहावर पवार आणि मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे. या बैठकीला राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटीलही पोहोचल्याने बैठकीत काय चर्चा होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अजित पवारांनी बहिणींच्या नावे बेनामी संपत्ती जमवली हे शरद पवारांना मान्य आहे का? सोमय्याचा सवाल
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे काही वेळा पूर्वीच सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांची मॅरेथॉन बैठक होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, परिवहन मंत्री अनिल परब आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित आहेत. या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार हे गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
देगलूर विधानसभा निवडणुकीआधीच भाजपला धक्का; भास्करराव पाटील खतगावकर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार
गेल्या काही दिवसांपासून पवारांच्या निकटवर्तीयांच्या घर, कार्यालयांवर धाडी पडल्या आहेत. एक दोन दिवस नाही तर सहा सहा दिवस आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी पवारांच्या निकटवर्तीयांच्या घरावर छापे मारले आहेत. तसेच भाजपचे नेते या कारवाईत बरंच घबाड सापडल्याचा दावाही करत आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांदरम्यान चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याशिवाय राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी नुकतच दहा हजार कोटींचं पॅकेज दिलं होतं. हे पॅकेज तुटपूंजं असल्याचं खुद्द शिवसेनेच्या नेत्यांनीही म्हटलं होतं. हे पॅकेज वाढवून देण्याबाबतही चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीला केवळ राष्ट्रवादीचे नेतेच उपस्थित आहेत. या बैठकीत काँग्रेसच्या एकाही नेत्याला किंवा मंत्र्याला बोलावण्यात आलेलं नाही. त्यामुळेही आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
Read Also :
- तीन हजार रोख, मटण-मासे पार्टी, पत्ते खेळायला पैसै! शिवसेना आमदाराने उलगडलं निवडणुकीचं गणित
- गेल्या पंधरा वर्षात राष्ट्रवादीने जेवढा विकास केला नाही, त्यापेक्षा जास्त आम्ही दोघांनी करून दाखवला
- भाजपला पडली मोठी खिंडार; येत्या १५ दिवसांत भाजपाचे ६ आमदार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार
- आणखी एका मंत्र्याच्या पापाचा घडा भरला; भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटलांचा रोख कुणाकडे?
- सत्ता कोणाचीही असो, अंगावर घेण्याची ताकद फक्त आमच्यातच – निलेश राणे