मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता वाढीव वीज बिलाच्या मुद्यावरून आक्रमक झाली आहे. वाढीव वीज बिल माफ करण्याचं सरकारनं ग्राहकांना आश्वासन दिलं होतं. मात्र, सरकारन ते पाळलं नाही, अशी टीका मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे.
नांदगावकर म्हणाले, आम्हाला शरद पवारांवर विश्वास आहे. परंतु शरद पवारांच्या शब्दालाही राज्य सरकारमध्ये किंमत उरलेली नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. वाढीव वीज बिलासंदर्भात शरद पवार आणि राज ठाकरे यांचं बोलणं झालं होतं. पण तरी देखील त्याच्यावर कार्यवाही झाली नाही, याचा अर्थ शरद पवारांच्या शब्दालाही सरकारमध्ये किंमत उरली नाही, असं आम्हाला वाटतं, असंही बाळा नांदगावकर यावेळी म्हणाले.
अन्यथा आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नाही…
बाळा नांदगावकर म्हणाले, आज मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या सरकारचे सर्वेसर्वा म्हणून शरद पवार यांनी आदेश द्यावे. महाविकास आघाडी सरकार वाढीव वीज बिल माफ करत आहे, असं जाहीर करावं. अन्यथा लोकांना सोबत घेऊन आंदोलन करण्याशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही, असंही नांदगावकर यांनी यावेळी जाहीर केलं.
Read Also ;
फडणवीसांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही: जयंत पाटील
भाजप आमदार प्रशांत बंब यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा
शिवसेनेच्या वचननाम्यातील ३० टक्के विज दर कपातीचे आश्वासन कागदावरच
“खोटे बोलण्याच्या आणि जनतेला फसवण्याच्या सवयीमुळे जनतेने भाजपला सत्तेवरून दूर केले “