पुणे : राज्यातील मागील काही राजकीय घडामोडीवरून राज्यातील राजकीय वातावरण चागलंच तापलं आहे. महाराष्ट्राबाहेर प्रकल्प गेल्यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रद्रेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज पुण्यात राष्ट्रवादीने राज्य सरकारविरोधात आंदोलन पुकारलं.
तू लाव टिकली, परंपरेच्या बाजारात अक्कल आम्ही विकली; सुळेंचा भिडेंना खोचक टोला
राज्य सरकारने रद्द केलेली पोलीस भरती, महाराष्ट्रातून इतर राज्यात गेलेले प्रकल्प, वाढती बेरोजगारी अशा विविध मुद्यांवर राष्ट्रवादीने पुण्यात आंदोलन केले. महाराष्ट्रात कोणतेही नवीन प्रकल्प आता येत नाहीत. महाविकास आघाडी सरकारने आणलेले प्रकल्प गुजरातला पळविण्याचे काम सुरू आहे. अशा बेकाल परिस्थितीत हे सरकार 75 हजार रोजगार निर्माण करण्याच्या घोषणा कोणत्या आधारावर देत आहे? बेरोजगारांच्या डोळ्यात धुळ फेकण्याचे हे काम आहे. असंही जयतं पाटील म्हणाले.
“महिलांचा अपमान केल्याप्रकरणी भिडेला अटक करा;” राष्ट्रवादीची मागणी
भारताला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पुर्ण झाल्याने राज्यात आज 7500 हजार उमेदवारांना नियुक्ती पत्र देऊन रोजगार देण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. आज मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही उमेदवारांना नियुक्तीपत्र देखील वाटप करण्यात आले. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधताना त्यांनी महाराष्ट्राच्या गुंतवणुक व्यवसायाबाबत भाष्य केले.
Read also
- नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी बाबत समितीचा अहवाल केंद्र सरकार कडे सादर
- “कडू झालेले तोंड गोड करण्यासाठी सपन प्रकल्पाला मंजूरी.!” काॅंग्रेसने बच्चू कडूंना डिवचलं
- नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्राला मोठं गिप्ट..! तब्बल 2 लाख कोटींचे 225 प्रकल्प मंजूर
- गुजरात विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर..! भाजपची सत्ता पणाला, तर केजरीवाल धमका करणार?
- “बच्चू कडू माझ्यासाठी छोटा विषय आहे, ते जर दम देत असेल तर..; 2 दिवसात राणांचा रवैया बदलला