मुंबई : मुंबई महापालिकेतील विरोधी पक्ष नेतेपद काँग्रेसकडे न राहता भाजपकडे जावं यासाठी खुद्द शिवसेना प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला होता. काँग्रेसने मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत दिले असून तेव्हापासून काँग्रेस आणि शिवसेनेत शाब्दिक चकमकी झडत आहेत.
काँग्रेसच्या आरोपानंतर आता शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आले असून, महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेमुळेच काँग्रेसला मिळाले आहे, हे लक्षात ठेवावे, असा इशारा दिला आहे.
शिवसेनेचे नेते आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे.
यशवंत जाधव म्हणाले की, रवी राजा यांनी जरी शिवसेनेवर आरोप केले असतील, तरी त्यांनी लक्षात घ्यावे की शिवसेनेमुळे त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळालंय. शिवसेनेने सहकार्य केले नसतं तर त्यांना हे पद मिळालं नसतं. पण ते आज असे का बोलतायत माहीत नाही.
महाविकास आघाडीवर याचा काही परिणाम होईल का ? याविषयी बोलताना ते म्हणाले की, शिवसेना अशा धमक्यांना घाबरत नाही. महाविकास आघाडीवर परिणाम होईल, असं काही मला वाटत नाही. छोटे मोठे मतभेद बसून सोडवले जातील. काँग्रेसने उगाच राईचा पर्वत करून नये.
Read Also :
- ‘सत्तेची भूक भागवण्यासाठी भाजपकडून राज्यपाल कार्यालयाचा वापर’
- ‘महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारणार का?’, नाना पटोले म्हणाले…
- ‘भाजपाने नाक घासून महाराष्ट्राची माफी मागितली, तरी या पापातून मुक्ती मिळणार नाही’
- ठाकरे सरकारची लगबग : औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ करण्याचा प्रस्ताव सादर
- पत्नी गौरी गडाख यांच्या आत्महत्येनंतर प्रशांत गडाख यांना कोणाचा आधार?
- औरंगाबादेत साखर सहसंचालकांविरोधात दारूची बाटली, मटण देऊन अनोखं आंदोलन