जळगाव : केळी पीक विम्याचे निकष बदलल्याने, आता केळीचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना, नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. मात्र, आता यावरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपत श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील आणि भाजपच्या जळगावच्या खासदार रक्षा खडसे यांच्यात, श्रेयवादावरून चांगलंच वाक्युद्ध रंगलं असून, दोन्ही नेते एकमेकांवर जोरदार टीका करताना पाहायला मिळत आहेत.
मी फडणवीसांना सन्यास घेवू देणार नाही, कारण…- संजय राऊत
“केळी पीक विमा योजनेच्या नुकसान भरपाईच्या निकषांत बदल करण्याचे श्रेय मला घ्यायचे नाही. मात्र, मंत्री गुलाबराव पाटील, हे मला माझ्या वडिलांसारखे आहेत. त्यामुळे, याप्रकरणी त्यांनी माझ्यावर टीका न करता, आपल्या मुलीने चांगलं काम केलं, म्हणून प्रोत्साहन द्यायाची गरज आहे,” असा खोचक टोला भाजप खासदार रक्षा खडसे यांनी, गुलाबराव पाटलांना लगावला होता.
ओबीसी आहोत म्हणून आपल्याला कमी दर्जाची मंत्रिपदं मिळतात; विजय वडेट्टीवारांचे गंभीर आरोप
दरम्यान, यावर आता गुलाबराव पाटलांनी देखील प्रत्युत्तर दिलं असून, “रक्षा खडसेंना मी वडिलांसारखा आहे, तर आता लेकीनेही बापाने केलेल्या कामाची जाण ठेवली पाहिजे. लेक ती लेकचं असते. लेकीने बापाच्याही कामाचा विचार करावा आणि बापाच्या हद्दीत राहावं,” असं उपरोधात्मक टीका, त्यांनी जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे.
‘सर्वकाही मनाप्रमाणे होईल, पण संन्यास घेऊ नका’, फडणवीसांवर सामनातुन खोचक टीका
“हे निकष राज्य शासनाने बदलले, पण रक्षा खडसे केंद्राने निकष बदलल्याचा खोटा दावा करत आहेत. जिथे कुठे लग्न दिसेल, तिथे त्या आपला बाजा घेऊन, त्या ठिकाणी वाजवायला हजर होतात,” अशा शब्दांत त्यांनी खडसेंवर टीका केली होती.
Read Also :
- केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल अटळ, पंतप्रधान, नड्डा, शहा यांची बैठक
- आंदोलन ओबीसी आरक्षणासाठी की, सत्तेच्या हव्यासापोटी; रोहित पवारांची भाजपावर टीका
- ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न म्हणजे, भाजपचे पाप; सचिन सावंत म्हणतात…
- मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे वणव्यात रूपांतर होण्यास वेळ लागणार नाही; दरेकर यांचा इशारा
- पालकमंत्री दत्तात्रय भरणे म्हणता मला ‘या’ जबाबदारीतून करा मुक्त?