पुणे : राष्ट्रीय स्वंय संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांनी काल नागपुर येथे जातीव्यवस्थेवर भाष्य़ केलं. ब्राम्हण हा त्याच्या कर्मामुळे, गुणांमुळे होतो हे धर्माशास्त्रात स्षट नमुद करण्यात आलं आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यावर आता काॅंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधत सवाल उपस्थित केले आहेत.
नाशिक बस अपघात…! अपघातातील नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर; मुख्यमंत्री
पेशवाई समकक्ष सत्ता स्थापित व्हावी या उद्देशाने स्थापन झालेल्या संघाने भूमिका खरोखरच बदलली यावर विश्वास ठेवावा, अशी संघाची इच्छा असेल तर संघाने 1949 साली मनुस्मृती असताना संविधानाची आवश्यता काय म्हटले होते ? आता मनुस्मृतीचा निषेध करा व संविधानावर विश्वास प्रकट करा. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली ते योग्य ते मान्य करा.
“..तरी पाटील हिंदू धर्माच्या विपरीत कसे काय बोलले?” अंधारेंचा सवाल
त्याचबरोबर समरसता ऐवजी समता म्हणा. कार्यकारिणीमध्ये दलित व ओबीसी कधी सामिल होणार ? दलित व महिला सरसंचालक नियुक्त कधी होणार ? सांगा अन्यथा या वाक्यातच वर्ण व जाती व्यवस्थेचा संघाने आजवर त्याग केला नाही ते स्पष्ट होते. असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या नातवावरील वक्तव्याचे पुण्यातही पडसाद
आपल्या धर्माशास्त्राला जातीगत विषमता मुळीच मान्य नाही. ब्राम्हण हा त्याच्या कर्मामुळे, गुणांमुळे होतो हे धर्मशास्त्रात स्पष्ट नमुद आहे. मग ही विषमता आली कुठुन? याला इतिहासाची पार्श्वभूमी आहे. जनुकीय शास्त्रानुसार 80 ते 90 पिढ्यांपुर्वी भारतात आंतरजातीय विवाह पद्धती होती. नंतरच्या काळात हळूहळू ती लोप पावली. त्यामुळे वर्णव्यवस्थेची चौकट अधिक घट्ट झाली. असं वक्तव्य राष्ट्रीय स्वंय संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांनी केलं आहे.
Read also
- “मोहन भागवतांनी नुसतं माफी मागून चालणार नाही, तर..”; शरद पवार
- “भाजप सत्तेच्या माध्यमातून भष्ट्रचार, भय, भूक निर्माण करतंय”
- “दहा कोटी रूपये कुठून आले? शिंदेसाहेब, हा महाराष्ट्र आहे;” अजित पवारांचा इशारा
- “या गोष्टींना जर बळ दिलं, तर मला खात्री..;” मोहन भागवतांच्या वक्तव्यांनंतर पाटलांची प्रतिक्रिया
- “धनुष्यबाणाचं भवितव्य निवडणुक आयोगाच्या हाती..!” शरद पवारांचं सुचक वक्तव्य