बुलढाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटना आपल्या आंदोलनासाठी ओळखली जाते. शेतकरी, दुग्धउत्पादकांच्या हक्कांसाठी लढणारी संघटना म्हणून स्वाभिमानि शेतकरी संघटनेला ओळखले जाते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हे सध्या कमालीचे चर्चेत आले आहेत. त्यांनी केलेल्या आंदोलनाला आता यश मिळाले आहे. महाराष्ट्रातील सोयाबीन आणि कापूस उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी रविकांत तुपकरांचे गेल्या ४ दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन चालू होते. केंद्र व राज्य सरकारने रविकांत तुपकरांच्या बऱ्याच मागण्या आता मान्य करून त्यांना समजावले आहे.
“कृषी कायदे लवकर मागे घेतले असते, तर हजारो शेतकऱ्यांचे प्राण वाचले असते”
यामध्ये केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्याशी फोनवरून चर्चा केली व यानंतर सोयापेंड देशात आयात करणार नाही, असं वचन दिलं आहे आणि याबाबत पुढील आठवड्यात आदेश करणार असल्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविकांत तुपकर यांना २४ नोव्हेंबर २०२१ रोजी बैठकीला येण्याचे निमंत्रण दिले आहे. तसेच तुपकरांच्या सोयाबीन आणि कापसाविषयी ज्या काही मागण्या आहेत त्यांबद्दल सकारत्मक विचार करू आणि लवकरात लवकर निर्णय घेऊ असं देखील अजित पवारांनी म्हटलं आहे. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली २४ नोव्हेंबरला ही बैठक पार होणार आहे.
या बैठकीला संबंधित खात्यांचे मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत. दरम्यान राज्य सरकार आणि रविकांत तुपकर यांच्यात बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी मध्यस्ती केली आणि त्यांच्या विनंतीनंतर तुपकरांनी आपले अन्नत्याग आंदोलन मागे घेतले. एवढंच नाही तर केंद्रीय मंत्र्यांकडून आलेले बैठकीचे निमंत्रण हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असल्याची प्रतिक्रिया तुपकरांनी दिली. मात्र, जर दोन्ही सरकारांनी आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर यावेळी महात्मा गांधींच्या मार्गाने आंदोलन केले, पुढच्या वेळी भगतसिंगांच्या मार्गाने आंदोलन करु, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
Read Also :
- ‘प्यार मे इजहार और राजनिती मे प्रचार’; मलिकांचा अजित पवारांना राजकीय सल्ला
- ‘चंद्रकांत पाटलांना शोक असेल तर शोकसभा घेऊ’, संजय राऊतांचा जोरदार टोला
- अखेर रामदास कदम यांना ‘रामराम’; शिवसेनेतून सुनील शिंदे, बाजोरीया यांना उमेदवारी
- फडणवीसांचा ‘तो’ गुण चांगला; नवाब मलिक यांनी कौतुक करत मारला टोला
- ‘पक्षाने विश्वास टाकला, सर्वांचे आभार, विधिमंडळात पुन्हा जोमाने काम करणार’