मुंबई : महाराष्ट्रात जवळपास ८ महिने ताळेबंदीत गेले मात्र आता राज्यात पुन्हा टाळेबंदी लावण्याची आवश्यकता नाही, राज्यातील काही बेजाबदार आणि बेफिकीर लोकांमुळे काही छोट्या मोठ्या प्रमाणात निर्बंध घालावे लागतील, त्यासंदर्भात नियमावली तयार करण्यात येईल असं वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. आता यावरून ताळेबंदीच स्वरूप कस असेल किंवा कशा पद्धतीने निर्बंध लागले जाऊ शकतात, याची चर्चावितर्क सुरु झाली आहे.
कोरोनाबाबत महाराष्ट्राची इतर राज्यांबरोबर तुलना केली तर महाराष्ट्राची स्थिती समाधानकारक आहे,त्यामुळे सध्या तरी टाळेबंदी करण्याची आवश्यकता नाहीये, महाराष्ट्रातील कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवू तसेच आता निश्चित टेस्टिंग करण्याची जबाबदारी हि जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांवर देणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
लसीकरणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सविस्तर बातचीत झाली असून सध्या देशात पाच लसींवर काम सुरु असून कोणती लास कोणत्या तारखेला उपलब्ध होईल हे सांगणे सध्या तरी कठीण आहे, जी लस लवकर येईल त्याच्या वाटपासंदर्भात प्राधान्यक्रम ठरवला जाईल आणि त्याच वाटप करण्यात येईल अशी माहिती मंत्री टोपे यांनी दिली आहे.
Read Also :
…म्हणून उद्धव ठाकरे संजय राऊतांची बडबड थांबवू शकत नाही, चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला चिमटा
“क्रिकेटपटू झहीर खानला आमदार करा”, ‘या’ माजी मंत्र्यांची राज्यपालांकडे पत्राद्वारे मागणी
‘अडचणीत आणाल तर आम्ही आणखी बळकट होऊ’, राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचं भाजपला प्रत्युत्तर
लग्न एकासोबत लफडं दुसऱ्यासोबत मनसेची शिवसेनेवर खोचक टीका