नवी दिल्ली : राज्यसभा आणि लोकसभेत प्रचंड गदारोळानंतर कृषी विदेयक मंजूर करण्यात आले. या विदेयकाला काँग्रेसने जोरदार विरोध केला होते. ज्या खासदारांनी काळ गदारोळ केला यावर त्यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली.
डेरेक ओब्रायन, दोला सेन (तृणमूल), राजीव सातव, रिपून बोरा, सईद नासीर हुसेन (काँग्रेस), संजय सिंह (आप), के.के. रागेश, इल्लामारम करीम (CPI-M) या आठ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.त्या विरोधात हे खासदार संसदेच्या आवारातच आंदोलन बसले आहेत. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ या खासदारांनी सकाळपासूनच ठिय्या ठोकला असून रात्री तिथेच मुक्काम करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
ही कारवाई म्हणजे मुस्कटदाबी असल्याची टीका या खासदारांनी केली आहे. सरकार आवज दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही या खासदारांनी केला आहे. राज्यसभेत त्या दिवशी मार्शल नसते तर सभापतींनाच धक्काबुक्की झाली असती असं मत सोमवारी केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी म्हटले होते.
Read Also :