मुंबई : राज्याच्या विधानसभेचे दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन जोरदार आरोप-प्रत्यारोप, टीका-टिपण्णीच्या चिखल-राड्यानंतर काल संपले. या दोन दिवसांत राज्याच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून आत्तापर्यंत कधीही पहिली गेली नव्हती, एवढी आक्रमकता पाहायला मिळाली. दरम्यान या दोन दिवसांत एकमेकांवर केलेल्या चिखलफेकीनंतर, आज भाजपवर, अधिवेशनाच्या दोन्ही दिवशी घातलेल्या राड्यावरून सत्ताधारी पक्षाचे आमदार टीका जोरदार करत आहेत.
भोसरी जमीन आर्थिक घोटाळा : एकनाथ खडसेंच्या जावयाला ईडीकडून अटक
पहिल्या दिवशी ओबीसी आऱक्षणाचा ठराव मंजूर करताना, भाजप आमदारांनी वेलमध्ये येत गोंधळ घातला, घोषणाबाजी केली, अध्यक्षांच्या समोरील माईक ओढला. तसेच, याहीपुढे जाऊन, तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की केली आणि अश्लील भाषेत शिवीगाळ केली. यामुळे भाजपच्या १२ आमदारांना १ वर्षासाठी निलंबित करण्यात आलं. हे कमी होते काय, म्हणून दुसऱ्या दिवशी भाजपकडून या घटनेचा निषेध म्हणून विधानसभेबाहेर सभागृहाच्या नियमांचे उल्लंघन करत, प्रतिविधानसभा भरवण्यात आली. तसेच, कामकाजात अडथळा आणण्यासाठी आमदार रवी राणा यांनी तर थेट राजदंडच पळवला.
आज देवेंद्र फडणीस यांच्या नशिबामध्ये राजयोग होता. मात्र हा राजयोग प्रति विधानसभा निर्माण केली त्या ठिकाणी होता. मात्र दुर्दैवाने ही सुद्धा संधी त्यांना मिळाली नाही!@TV9Marathi @zee24taasnews @abpmajhatv @MiLOKMAT @saamTVnews @news_lokshahi @MaxMaharashtra @NCPspeaks
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) July 6, 2021
दरम्यान, यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी, भाजपवर ट्विट करून टीकाकेला आहे. “काल त्यांनी प्रति विधानसभा मांडली, उद्या प्रति संविधानही मांडतील. सावधान रहें, सतर्क रहें,” असं ट्विट त्यांनी केलं आहे. तसेच, “काल देवेंद्र फडणवीस यांच्या नशिबामध्ये राजयोग होता. मात्र हा राजयोग प्रति विधानसभा निर्माण केली त्या ठिकाणी होता. मात्र दुर्दैवाने ही सुद्धा संधी त्यांना मिळाली नाही!,” अशी खोचक टीका त्यांनी फडणवीस यांच्यावर केली आहे.
काल त्यांनी प्रति विधानसभा मांडली, उद्या प्रति संविधानही मांडतील.
सावधान रहें, सतर्क रहें…— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) July 7, 2021
तसेच, या झालेल्या प्रकारावर प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी, “महाराष्ट्राच्या सुसंस्कृत लोकशाही परंपरेला आज भाजपने काळे फासले… राज्याच्या सर्वोच्च सभागृहात पीठासीन अधिकाऱ्यांना अर्वाच्च भाषेत बोलणे, त्यांच्या समोरील माईकची तोडफोड करणे अशी गुंडगिरी सभागृहात अशोभनीय आहे. आज वर्षभरासाठी निलंबित झालेत पण जनता यांना कायमचं निलंबित करणार,” अशी टीकेची तोफ डागली आहे.
महाराष्ट्राच्या सुसंस्कृत लोकशाही परंपरेला आज भाजपने काळे फासले…
राज्याच्या सर्वोच्च सभागृहात पीठासीन अधिकाऱ्यांना अर्वाच्च भाषेत बोलणे, त्यांच्या समोरील माईकची तोडफोड करणे अशी गुंडगिरी सभागृहात अशोभनीय आहे. आज वर्षभरासाठी निलंबित झालेत पण जनता यांना कायमचं निलंबित करणार.— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) July 5, 2021
Read Also :
- जावयापाठोपाठ एकनाथ खडसे आणि मंदाकिनी खडसेंनाही अटक होणार?
- “तुमची गाडी पेट्रोलवर चालत असेल पण मोदी सरकार कर वसुलीवर चालते”
- मराठा उमेदवारांना मोठा दिलासा: २०१४ च्या ईएसबीसी उमेदवारांना सेवेत कायम करण्याचा निर्णय – अशोक चव्हाण
- “पावसाळी अधिवेशनात जनहिताचे निर्णय घेतल्याचे समाधान”- मुख्यमंत्री
- “विमा कंपन्या आणि सरकारचं साटंलोटं; त्यांनी सरकारला लॉलीपॉप दिलं आहे.”