मुंबई : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी आक्रमक होत, पायऱ्यांवर बसून ठिय्या आंदोलन केलं. तसेच, यावेळी विधानसभेच्या आवारात प्रतिविधानसभा भरवून, त्यांनी ठाकरे सरकारच्या मनमानी कारभाराविरुद्ध निषेध जाहीर केला आणि अधिवेशनावर बहिष्कार घातला. मात्र, सत्ताधारी पक्षांतील आमदारांनी, यावर कारवाई करण्याची मागणी अध्यक्षांकडे केली आणि अध्यक्षांच्या आदेशाने भाजपच्या प्रतिविधानसभेवर कारवाई करण्यात आली.
भास्कर जाधव यांना मिळणार संरक्षण; गृहमंत्र्यांनी दिली विधानसभेत ग्वाही
यावेळी, पत्रकारांना तेथून मार्शलद्वारे हाकलण्यात आलं. त्यांचे कॅमेरे ओढले गेले. भाजप नेत्यांनी घेतलेले माईक, स्पीकर ताब्यात घेण्यात आले. तसेच, त्यांना विधानसभेच्या आवारातून हाकलण्यात आले. यानंतर भाजप नेत्यांनी आपला मोर्चा पत्रकारांच्या दालनाकडे वळवला आणि तिथे माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी, ठाकरे सरकारवर अनेक मुद्द्यांना घेऊन जोरदार हल्लाबोल केला.
विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी विशेष अधिवेशन बोलावणार?
“खाजगी विमा कंपन्या आणि या सरकारचं साटंलोटं आहे. या विमा कंपन्यांनी ठाकरे सरकारला लॉलीपॉप दिलं आहे. ३० रुपये प्रति कि. धान्यासाठी सरकारनं १५० रु. मोजले. युतीच्या काळात आम्ही शेतकऱ्यांना साडेपाच हजार कोटी रु. दिले, तर या सरकारने ८०० कोटी, हे सरकार सातत्याने याच प्रयत्नात आहे, की शेतकऱ्यांना पीक विमा मिळू नये. या ठाकरे सरकारने शेतकऱ्यांची सगळ्या बाबतीत फसवणूक केली आहे,” असा आरोप त्यांनी केला आहे.
‘‘टप्प्यात आलेल्या भाजपचा महाविकास आघाडी सरकार कडून करेक्ट कार्यक्रम’’
“ठाकरे सरकारने बियाणांमध्येही गोंधळ केला आहे. खासगी उत्पादकांचं बियाणं जास्त खपलं जावं, म्हणून महाबीजला बियाण्यांचं उत्पादन करुन दिलं नाही. या सरकारकडून शेतकऱ्यांना नागवण्याचं काम सुरु आहे. हे सरकार, शेतकऱ्यांचे अजून किती शिव्या-शाप घेणार आहे?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी, “पंतप्रधानांनी लसी दिल्या, म्हणून राज्यात जास्त लसीकरण झाले. मात्र, दुसरीकडे मुंबईत मोठ्या प्रमाणात महामारीमुळे झालेले मृत्यू लपवण्यात आले आणि मुंबई मॉडेलच्या नावाखाली स्वतःची पाठ थोपटवून घेण्यात आली. पण हे ‘मुंबई मॉडेल’ नसून, ‘मृत्यू मॉडेल’ आहे,” असा घणाघात त्यांनी महाविकास आघाडीवर केला आहे.
Read Also :
- “…तर भाजपचे १२ नाही १८ आमदार निलंबित झाले असते”, निलंबनावर अजित पवारांचं भाष्य
- राज्यात होणार राजकीय भूकंप? सेना-भाजप युतीवर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान!
- कालचा प्रकार बघून मी हि चकीत झालो; १२ आमदारांच्या निलंबनावर मुख्यमंत्री ठाकरेंनी सोडलं मौन
- “सर्वच केंद्राने करायचे, तर मग तुम्हाला भजी-वडे तळायला बसवलंय काय?”
- मुख्यमंत्र्यांच्या वन खात्यात बदल्यांसाठी रेट कार्डवर काम सुरु; फडणवीसांनी केला गौप्यस्फोट