मुंबई : दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, ओबीसी आरक्षणाविषयाच्या ठरावावेळी, भाजपच्या १२ आमदारांनी हौदात पुढे येऊन जोरदार घोषणाबाजी केली, गोंधळ घातला, तालिका अध्यक्षांसमोरील माईक काढून घेतला. यावेळी दोन्हीकडून झालेल्या जोरदार गोंधळातच हा ठराव मंजूर करण्यात आला आणि कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.
“ठाकरे सरकारकडून महाराष्ट्रात आणीबाणी लावण्यात आली आहे”- देवेंद्र फडणवीस
दरम्यान, कामकाज सुरु झाल्यानंतर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी, “या दरम्यानच्या १० मिनिटांत भाजप नेत्यांनी केबिनमध्ये गर्दी करून मला धक्काबुक्की केली. तसेच, मला माझ्या आई-बहिणींवरून शिवीगाळ केली,” असा धक्कादायक आणि खळबळजनक आरोप, सभागृहात सगळ्यांसमोर भाजप आमदारांवर केला आणि या गैरवर्तनामुळे भाजपच्या १२ आमदारांना १ वर्षांसाठी निलंबित करण्याचा प्रस्ताव सभागृहासमोर ठेण्यात येत असल्याचे सांगत, हा ठराव मंजूर केला. यांनतर सभागृहाचे वातावरण चांगलेच तापले.
रिक्त पदं भरण्यास मान्यता देण्यात आलीये; अजित पवारांची सभागृहात महत्वाची माहिती
यांनतर आज, विधानसभेबाहेर भाजप नेत्यांनी प्रतिविधानसभा भरवत, सरकारच्या मनमानी कारभार आणि १२ आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईविरुद्ध, प्रचंड गोंधळ घालत निषेध नोंदवला. दरम्यान, यावर सत्ताधारी पक्षांच्या आमदारांनी आवाज उठवला आणि अध्यक्षांना भाजप नेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. या आदेशानंतर विरोधकांवर कारवाई करण्यात आली आणि त्यांना विधानसभेच्या आवारातून हाकलून देण्यात आलं.
‘‘टप्प्यात आलेल्या भाजपचा महाविकास आघाडी सरकार कडून करेक्ट कार्यक्रम’’
या सगळ्या जोरदार आरोप-प्रत्यारोप, टीका-टिपण्णीच्या चिखल-राड्यानंतर, दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाची आज सांगता झाली. त्यानंतर या सर्व घटनाक्रमावर आणि एकंदरीत पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजावर भाष्य करण्यासाठी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी १२ आमदारांच्यावर केली गेलेली निलंबनाची कारवाई ही जाणूनबुजून केली गेली आहे, या गोष्टीचे उपमुख्यमंती अजित पवार यांनी खंडण केले आणि भाजप नेत्यांना चांगलेच धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले.
विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी विशेष अधिवेशन बोलावणार?
“निलंबनाची कारवाई ही मुद्दामून करण्यात आली नाही. राज्यपालांनी आमचे १२ आमदारांच्या नियुक्त्या राखडवून ठेवल्या म्हणून आम्हीही असं केलं, यातला काही हा प्रकार नाहीये. त्यांच्याकडून ज्या चुका सभागृहात झाल्या. त्यातल्या काही, त्यांनी स्वत:हून मान्य केल्या. त्यावर ही कारवाई आहे. इथे फक्त कावळा बसायला आणि फांदी तुटायला अशातला प्रकार झाला. त्यांच्या जागी १८ आमदारांनी गोंधळ घातला असता, तर १८ आमदारांना निलंबित केले गेले असते,” अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी या वृत्ताचे खंडण केले.
Read Also :
- राज्यात होणार राजकीय भूकंप? सेना-भाजप युतीवर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान!
- कालचा प्रकार बघून मी हि चकीत झालो; १२ आमदारांच्या निलंबनावर मुख्यमंत्री ठाकरेंनी सोडलं मौन
- “सर्वच केंद्राने करायचे, तर मग तुम्हाला भजी-वडे तळायला बसवलंय काय?”
- मुख्यमंत्र्यांच्या वन खात्यात बदल्यांसाठी रेट कार्डवर काम सुरु; फडणवीसांनी केला गौप्यस्फोट
- भास्कर जाधव यांना मिळणार संरक्षण; गृहमंत्र्यांनी दिली विधानसभेत ग्वाही