मुंबई : प्रचंड गदारोळात आणि राजकीय हेवे-दावे, टीका-टिपण्णी, आरोप-प्रत्यारोपटं सांगता झालेल्या, राज्याच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात, घडलेल्या आश्चर्यकारक राजकीय घडामोडींसोबतच ९ विधेयके दोन्ही सभागृहात संमत करण्यात आली असल्याची माहिती, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी बोलताना दिली. “हे अधिवेशन दोनच दिवसांचे होते, तरीही जनतेच्या हिताचे कामकाज करता आले याचे समाधान आहे,” असे उद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी काढले. या दोन दिवसाच्या अधिवेशनात खालीलप्रमाणे कामकाज झाले, त्याविषयी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी माहिती दिली.
पत्रकार परिषद – LIVE https://t.co/T6WcG6KFus
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 6, 2021
- मराठा आरक्षणासाठी पन्नास टक्क्यांची मर्यादा शिथील करण्याची केंद्र शासनाला शिफारस करणारा ठराव
- ओबीसी आरक्षणासाठी केंद्र सरकारकडून इम्पिरिकल डेटा मिळविण्याचा ठराव
- 2014 च्या ईएसबीसी उमेदवारांना मोठा दिलासा. तात्पुरत्या नियुक्त्या, वयोमर्यादेत वाढ
- लवकरच महाराष्ट्र आयोगामार्फत १५ हजार ५१५ वर्ग एक आणि वर्ग दोनची पदे भरणार तसेच आयोगातील सदस्यांची रिक्त पदे ३१ जुलैपर्यंत भरणार
- केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्यांत सुधारणा करून नवे विधेयक सादर
- आरोग्य विभागास प्राधान्याने निधी ( पुरवणी मागण्या)
- कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्याचा ठराव
- लसीकरण दरमहा वाढीव ३ कोटी डोसेस केंद्राकडून घेण्याबाबत ठराव
- २३ हजार १४९ कोटी रुपयांच्या पूरवणी मागण्यांमध्ये ग्रामीण आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी सर्वाधिक निधी
- सार्वजनिक आरोग्य विभागासाठी सर्वाधिक ३ हजार ६४४ कोटी ३० लाख ५७ हजार रुपयांची पुरवणी मागणी मंजूर
‘‘टप्प्यात आलेल्या भाजपचा महाविकास आघाडी सरकार कडून करेक्ट कार्यक्रम’’
तसेच, “विधानभवनात काल जे घडलं ते महाराष्ट्राच्या परंपरेला लाजिरवाणं होतं. ही आपली संस्कृती नाही. उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार आपण देतो. मात्र एकूण जे कामकाज चाललं आहे. हा दर्जा खालावत चालल्याचं दिसून येते. लोकप्रतिनिधींकडून जनतेची काही अपेक्षा असते. काल जे काही दृश्य पाहायला मिळालं शरमेने मान खाली जाणारं कृत्य आहे. भास्कर जाधव यांच्यासोबत जे घडलं ते ऐकल्यावर असं महाराष्ट्रात घडू शकतं यावर विश्वास बसत नाही. सत्ता एके सत्ता हाच अट्टाहास असेल तर एकूणच सगळं वाईट चाललं आहे. जबाबदार पक्षाकडून हे घडलं,” असं त्यांनी सांगितले.
विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी विशेष अधिवेशन बोलावणार?
यावेळी, राज्यात होणार राजकीय भूकंप? सेना-भाजप युती होणार का? या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी मोठे विधान केले आहे. मुख्यमंत्र्यांनी ३ आठवड्यांपूर्वी दिल्लीत जाऊन पंतप्रधानांची भेट घेतली होती. यावेळी त्यांच्यात वैयक्तिक ३० मि. चर्चा झाली. याच गुप्त भेटीनंतर लवकरच राज्यात राजकीय उलथापालथ होणार, या प्रकारच्या चर्चांना उधाण आले. अशातच केंडेनिय मंत्री मंडळाच्या विस्तारात शिवसेना खासदारांना मंत्री पद दिले जाणार, अश्या अफवांना पेव फुटले. या पार्श्वभूमीवर विचारल्या गेलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री यांनी उत्तर दिलं आहे.
मुख्यमंत्र्यांच्या वन खात्यात बदल्यांसाठी रेट कार्डवर काम सुरु; फडणवीसांनी केला गौप्यस्फोट
“तीस वर्ष सोबत असूनही भाजपसोबत काही घडलं नाही, मग आता काय घडेल?? आणि आता तर मी दोघांच्या (अजित पवार, बाळासाहेब थोरात) मध्ये आहे, यांच्यातून मला बाहेर पडायचं असेल, तर या दोघांना टाळण शक्य आहे, असं तुम्हाला वाटतं का?,” अशा सडेतोड शब्दांत त्यांनी या चर्चांना पूर्णविराम देऊन, राज्याच्या राजकारणात, अशा प्रकारचा कोणताही राजकीय भूकंप होणार नाहीये हे स्पष्ट केलं.
Read Also :
- “विमा कंपन्या आणि सरकारचं साटंलोटं; त्यांनी सरकारला लॉलीपॉप दिलं आहे.”
- “…तर भाजपचे १२ नाही १८ आमदार निलंबित झाले असते”, निलंबनावर अजित पवारांचं भाष्य
- राज्यात होणार राजकीय भूकंप? सेना-भाजप युतीवर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान!
- कालचा प्रकार बघून मी हि चकीत झालो; १२ आमदारांच्या निलंबनावर मुख्यमंत्री ठाकरेंनी सोडलं मौन
- “सर्वच केंद्राने करायचे, तर मग तुम्हाला भजी-वडे तळायला बसवलंय काय?”