मुंबई : अर्णब गोस्वामीला अटक केल्यानंतर आता सर्व भाजप नेते त्याच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत, काल राज्यभरात अर्नबच्या अटकेविरोधात आंदोलन केल्यानंतर आता भाजप नेते थेटपने महाराष्ट्र सरकारला लक्ष्य करताना अर्नबच्या समर्थानात उतरले आहेत. अर्णब गोस्वामीला काल त्याला अलिबाग न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सरकारी पक्षाची न्यायालयाकडे पोलिस कस्टडीची मागणी न्यायालयाने फेटाळली आणि अर्णब गोस्वामी सह तिघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने पत्रकार अर्णव गोस्वामी यांना अहंकारी भावनेने अटक केली आहे. त्यांच्या या वृत्तीचा देशपातळीवर धिक्कार होत असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. आम्ही ठाकरे सरकारची ही दडपशाही खपवून घेणार नाही. यापूर्वी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती तेव्हा देशातील जनतेने ती सत्ता उलथवून टाकली. त्यामुळे भविष्यात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या सगळ्याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला.
दरम्यान अर्णब गोस्वामींच्या अटकेमुळे आत सर्व भाजप नेते महाराष्ट्र सरकारला लक्ष्य करत असताना आता दिल्लीतून महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यात आला आहे, भाजपचे नेते तेजिंदरपाल सिंग बग्गा यांनी महाराष्ट्र सरकारचा निषेध करताना महाराष्ट्र सदनाबाहेर ‘आणीबाणीत स्वागत आहे’ आणीबाणी २.० अशा आशयाचे फलक लावले आहेत, आता यावरून एक नवीनच वादंग सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Read Also :
भाजप नेते माजी खासदार संजय काकडे यांना पत्नीसह अटक, चतुःशृंगी पोलिसांची कारवाई
‘अग्रलेखाच्या शाईचे डाग तुमच्या कपड्यांवर दिसतायेत’, आशिष शेलारांचा संजय राऊतांना टोला
‘मंत्री यशोमती ठाकूर यांना मंत्रिपदावरून काढल्यास ठाकरेंना महाविकास आघाडी सरकार पडण्याची भीती’
दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर ‘या’ कारणामुळे झळकले ‘आणीबाणीत स्वागत आहे’ चे पोस्टर
मुख्यमंत्री नितीश कुमारांनी ‘या’ कारणामुळे ‘फालतू बात’ म्हणत योगी आदित्यनाथांना झापले