दिल्ली : महाराष्ट्रात अर्णब गोस्वामीच्या अटकेने मोठा राजकीय गदारोळ माजलेला असताना आता राजधानी दिल्लीतून महाराष्ट्राच्या निषेधाच्या बातम्या येत आहेत. अन्वय नाईक आणि त्यांची आई कुमुद नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामीला अटक केली असून काल त्याला अलिबाग न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
अर्णब गोस्वामींच्या अटकेमुळे आत सर्व भाजप नेते महाराष्ट्र सरकारला लक्ष्य करत असताना आता दिल्लीतून महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यात आला आहे, भाजपचे नेते तेजिंदरपाल सिंग बग्गा यांनी महाराष्ट्र सरकारचा निषेध करताना महाराष्ट्र सदनाबाहेर ‘आणीबाणीत स्वागत आहे’ आणीबाणी २.० अशा आशयाचे फलक लावले आहेत, आता यावरून एक नवीनच वादंग सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आपातकाल 2.0 pic.twitter.com/dkh1Ye0ubM
— Tajinder Pal Singh Bagga (@TajinderBagga) November 5, 2020
सरकारी पक्षाची न्यायालयाकडे पोलिस कस्टडीची मागणी न्यायालयाने फेटाळली आणि अर्णब गोस्वामी सह तिघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याची तक्रार केल्याची अर्णब यांनी कोर्टाकडे केली होती. मात्र कोर्टाने कोर्टाने प्रथमदर्शनी पोलिसांकडून मारहाण झाल्याचे दिसत नसल्याचे सांगत न्यायलयाने त्यांची तक्रार फेटाळून लावली होती.
Read Also :
मुख्यमंत्री नितीश कुमारांनी ‘या’ कारणामुळे ‘फालतू बात’ म्हणत योगी आदित्यनाथांना झापले
ईव्हीएम मतदान यंत्र नव्हे तर ‘मोदी मतदान यंत्र’
‘सूडाच्या राजकारणासाठी मराठी बाणा आणि सोयीच्या राजकारणासाठी हिंदुत्व लाचारसेनेचा वाकलेला कणा’
“भाजपवाल्यांना सवतीची पोरं मांडीवर खेळवण्यात अलीकडे मौज वाटू लागलीय” ; शिवसेनेचा हल्लाबोल
“अर्णब हा भाजपचा प्रवक्ता आहे. म्हणून भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर”