दिल्ली : ईव्हीएम मतदान यंत्र हे वोटिंग मशीन नसून ‘मोदी मतदान यंत्र’ आहे, असा घणाघात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. ईव्हीएम असो या नरेंद्र मोदी या दोघांनाही मी घाबरत नाही, सत्य हे सत्य आहे आणि सत्य हेच न्याय आहे.
मोदी सरकारविरोधात मी विचारसरणीचा लढा देत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. बिहारच्या अरारियामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाच्या उमेदवारीच्या प्रचारार्थ राहुल गांधी बोलत होते. तेव्हा त्यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
सध्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार शिगेला पोहचला आहे. काँग्रेस आणि भाजप दोन्ही नेते एकमेकांवर जोरदार टीका करताना पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री नितीश कुमारांनी तेजस्वी यादव यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय तर राजदने सुद्धा भाजप आणि जेदयुच्या आघाडीला लक्ष्य केलं आहे.
दरम्यान महाराष्ट्रात अर्णब गोस्वामींच्या अटकेवरून भाजपने शिवसेनेला लक्ष्य केलं आहे तर शिवसेनेने भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिल आहे. महाराष्ट्राच्या भाजपवाल्यांनी अन्वय नाईक यांना न्याय मिळावा म्हणून वाद घालायला हवा. ते मराठी मातीचे पुत्र आहेत. पण भाजपवाल्यांना सवतीची पोरं मांडीवर खेळवण्यात अलीकडे मौज वाटू लागली आहे.
मराठी माणूस मेला तरी चालेल, पण सवतीच्या पोरास सोन्याच्या चमच्याने दूध पाजायचे असे त्यांचे धोरण स्पष्ट आहे, असं म्हणत शिवसेनेनं भाजपावर टीका केली आहे. शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून विरोधकांवर हल्लाबोल केला.
Read Also :
‘सूडाच्या राजकारणासाठी मराठी बाणा आणि सोयीच्या राजकारणासाठी हिंदुत्व लाचारसेनेचा वाकलेला कणा’
“भाजपवाल्यांना सवतीची पोरं मांडीवर खेळवण्यात अलीकडे मौज वाटू लागलीय” ; शिवसेनेचा हल्लाबोल
“अर्णब हा भाजपचा प्रवक्ता आहे. म्हणून भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर”
नोव्हेंबरच्या अखेर पर्यंत महाराष्ट्र पूर्णतः सुरू होईल ; विजय वट्टेडीवार