पाटणा : बिहार विधानसभा निवडणूक २०२० दरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार आणि त्यांचा सहकारी पक्ष भाजपमध्ये मतभेद असल्याचं आता स्पष्टपणे समोर आले आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपचे स्टार प्रचारक उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जाहीर सभांतील वक्तव्यांमुळे तर या गोष्टीवर शिक्कामोर्तबच झालं आहे.
काही दिवसांपूर्वी भाजचे स्टार प्रचारक आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कटिहारच्या एका जाहीर सभेत बांग्लादेशी घुसखोरांना देशातून ‘बाहेर फेकण्याचं’ वक्तव्य केलं होतं. यावरच निशाणा साधत जनता दल युनायटेडचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी योगींच्या वक्तव्याला ‘फालतू बात’ म्हटलंय. ‘कुणातही इतका दम नाही की ते आपल्या लोकांना देशाच्या बाहेर काढू शकतील’, असंही मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटलंय.
सब को साथ ले कर चलना ही हमारा धर्म है। यही हमारी संस्कृति है। सब साथ चलेंगे तो बिहार आगे बढ़ेगा। pic.twitter.com/uEfnVJPiay
— Nitish Kumar (@NitishKumar) November 4, 2020
दरम्यान ईव्हीएम मतदान यंत्र हे वोटिंग मशीन नसून ‘मोदी मतदान यंत्र’ आहे, असा घणाघात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. ईव्हीएम असो या नरेंद्र मोदी या दोघांनाही मी घाबरत नाही, सत्य हे सत्य आहे आणि सत्य हेच न्याय आहे, मोदी सरकारविरोधात मी विचारसरणीचा लढा देत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. बिहारच्या अरारियामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाच्या उमेदवारीच्या प्रचारार्थ राहुल गांधी बोलत होते. तेव्हा त्यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
Read Also :
ईव्हीएम मतदान यंत्र नव्हे तर ‘मोदी मतदान यंत्र’
‘सूडाच्या राजकारणासाठी मराठी बाणा आणि सोयीच्या राजकारणासाठी हिंदुत्व लाचारसेनेचा वाकलेला कणा’
“भाजपवाल्यांना सवतीची पोरं मांडीवर खेळवण्यात अलीकडे मौज वाटू लागलीय” ; शिवसेनेचा हल्लाबोल
“अर्णब हा भाजपचा प्रवक्ता आहे. म्हणून भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर”
नोव्हेंबरच्या अखेर पर्यंत महाराष्ट्र पूर्णतः सुरू होईल ; विजय वट्टेडीवार