मुंबई : पोलिसांसोबत केलेल्या गैरवर्तवणूकच प्रकरण मंत्री यशोमती ठाकूरांना भोवणार असल्याचं चित्र सध्या आहे कारण त्यांच्यावरील गुन्हा सिद्ध होऊन न्यायालयाने त्यांना ३ महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. आता अशातच त्यांचं मंत्रीपद जाणार कि राहणार? याविषयी आता शंका उपस्थित केल्या जात आहे. आणि याचाच आधार घेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री व अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणात शिक्षा झाली. यशोमती ठाकूर यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, या मागणीवरून भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत.
यशोमती यांना मंत्रिपदावरून काढल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सरकार पडण्याची भीती आहे, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तिवसा येथे आंदोलना दरम्यान लगावला.
काय आहे प्रकरण?
24 मार्च 2012 रोजी अमरावतीच्या प्रसिद्ध अंबादेवी मंदिराजवळ पोलिसाची हुज्जत घातल्या प्रकरणी यशोमती ठाकूर यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता. पोलीस कॉन्सेटबलवर हात उगारल्याचाही आरोप होता. त्यावर गुरुवारी जिल्हा न्यायालायात सुनावणी पूर्ण झाली. न्या. उर्मिला जोशी यांनी यशोमती ठाकूर यांना प्रकरणात शिक्षा सुनावली.
विरोधी पक्ष असलेल्या भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. या प्रकरणाचा सविस्तर निकाल अद्याप हाती आलेला नाही. यशोमती ठाकूर यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
Read Also :
दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर ‘या’ कारणामुळे झळकले ‘आणीबाणीत स्वागत आहे’ चे पोस्टर
मुख्यमंत्री नितीश कुमारांनी ‘या’ कारणामुळे ‘फालतू बात’ म्हणत योगी आदित्यनाथांना झापले
ईव्हीएम मतदान यंत्र नव्हे तर ‘मोदी मतदान यंत्र’
‘सूडाच्या राजकारणासाठी मराठी बाणा आणि सोयीच्या राजकारणासाठी हिंदुत्व लाचारसेनेचा वाकलेला कणा’
“भाजपवाल्यांना सवतीची पोरं मांडीवर खेळवण्यात अलीकडे मौज वाटू लागलीय” ; शिवसेनेचा हल्लाबोल