परभणी : येत्या दोन ते तीन महिन्यात ठाकरे सरकार पडेल आणि आपले सरकार येईल. ते कसं येणार आहे, ते पत्रकारांना लवकरच कळवतो, अशी फटकेबाजी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या प्रचारानिमित्त ते परभणीत बोलत होते.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ तीन वेळेस भाजपकडे होता, पण गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर तो राष्ट्रवादीकडे गेला. नाहीतर हा मतदारसंघ आपल्या हातून जात नव्हता. याचा बदला या निवडणुकीत घेऊन भाजपचा उमेदवार पुन्हा निवडून आणायचा आहे. गेल्या काही वर्षात आमदाराने एकही प्रश्न विधानपरिषदेत उपस्थित केला नाही, असं रावसाहेब दानवे म्हणाले. मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजप उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी परभणीत आयोजित बैठकीत ते बोलत होते.
कधी एकमेकांचे तोंडही न पाहणारे तीन पक्ष एकत्र येऊन सरकार चालवत आहेत. पण येत्या दोन ते तीन महिन्यात महाविकास आघाडीचे सरकार पडेल आणि आपले सरकार येईल.
आपल्याला एकाचे पाच आणि पाचाचे पन्नास करायचे. कुटुंब नियोजन करायचं का? पक्षाचं नाही करायचं. पक्ष वाढला पाहिजे. विधानसभा लोकसभा निवडणुकांनंतर ही पहिली निवडणूक आहे, आपल्याला यश मिळालं पाहिजे. असं सांगत कार्यकर्त्यांना बूथनिहाय पुन्हा कामं जोमाने करण्याचं आवाहन रावसाहेब दानवे यांनी केलं.
दरेकरांकडून सरकार बदलण्याचा दावा
राज्यातील जनता आज त्रस्त आहे. उद्या महाराष्ट्रातील पाचही जागा भाजप जिंकल्यानंतर महाराष्ट्रातील जनतेला तुमचं सरकार नकोय हे स्पष्ट होईल. तुमच्या एक वर्षाच्या सरकारला जनता त्रस्त झाली आहे, असं म्हणत महाराष्ट्रात सरकार बदलण्याच्या हालचाली होतील” असं मोठं वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दोनच दिवसांपूर्वी केलं होतं.
Read Also :
वीज बिलाविरोधात भाजपचे आंदोलन म्हणजे मगरीचे अश्रू प्रकाश आंबेडकरांची टीका
‘आम्हाला चंपा, टरबुजा बोललेले कसे चालते?’
बॅनरवरून काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा फोटो गायब, महाविकास आघाडीच्या बैठकीत राडा
‘आपला मुख्यमंत्री, आपले नशीब, आपले दुर्दैव, आपली जबाबदारी’, मनसेचा हल्लाबोल
राज्यातील सरकारला जनतेच्या जीवाची पर्वा नाही, चंद्रकांत पाटलांची टीका