मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारला जनतेच्या जीवाची पर्वा नाही. राज्यात वाढीव वीजबिल घोटाळ्यामुळे सामान्य जनता आत्महत्या करीत आहे. पण सरकार असंवेदनशील आहे, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.
वाढीव वीजबिल विरोधात भाजपाच्या वतीने सोमवारी राज्यभरात आंदोलन करण्यात आले. वीज बिलांची होळी करण्यात आली. त्यापार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे.
राज्य सरकारच्या या वाढीव वीजबिल घोटाळ्यामुळे सामान्य जनता आत्महत्या करत आहे, पण हे राज्य सरकार एवढं असंवेदनशील झालं आहे की, त्याला जनतेच्या जीवाची काहीही पर्वा नाही ! #महाआघाडीवीजघोटाळा#MVAPowerScam
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) November 23, 2020
चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर केलेल्या विधानावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले कि राजकारणात येण्यापूर्वी मला शरद पवार मोठे नेते वाटायचे. मात्र, राजकारणात आल्यावर समजले की, ते खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो, अशी खोचत टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती.
थेट शरद पवारांवर निशाणा साधल्यानंतर अजित पवार यांच्यासह अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते चंद्रकांत पाटलांवर टीका करताना तुटून पडले. आता आपल्या वक्तव्याबाबत चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. शरद पवार यांचा मला अनादर करायचा नव्हता. त्यांच्याबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. ते पुण्यात बोलत होते.
Read Also :
‘आम्हाला चंपा, टरबुजा बोललेले कसे चालते?’
बॅनरवरून काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा फोटो गायब, महाविकास आघाडीच्या बैठकीत राडा
‘आपला मुख्यमंत्री, आपले नशीब, आपले दुर्दैव, आपली जबाबदारी’, मनसेचा हल्लाबोल