मुंबई : आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक सध्या तुरुंगात आहेत. गेल्या अनेक महिन्यापासून त्यांच्या जामीन अर्जावर देखील सुनावणी झाली नाही. तसेच त्यांचे अनेकदा जामीन अर्ज देखील न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. यातच आता केंद्रीय तपास यंत्रणांकडून नवाब मलिक यांची संपत्ती जप्त करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“आम्ही कधीही विकासकामांमध्ये राजकारण केलं नाही”; चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना टोला
जयंत पाटील म्हणाले की, नवाब मलिक यांच्यावरील आरोप अद्यापही पुर्णपणे सिद्ध झाले नाहीत. तरी देखील त्यांची संपत्ती जप्त करणे, त्यांना इतके महिने तुरूंगात ठेवणे योग्य नाही, नवाब मलिक यांनी अनेक वेळा न्यायालयाची दारं ठोठावली आहेत. परंतु त्यांना अजून न्याय मिळालेला नाही. त्यांच्यावरील आरोप सिद्ध झालेले नाही. एजन्सीने ते आरोप केले आहेत. न्यायालयात अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे अशा पद्धतीने मालमत्ता जप्त करणे अयोग्य आहे. असं देखील जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
“हे बा-पांडुरंगा, महाराष्ट्रावर तुझी कृपा कायम ठेव”, आगामी निवडणुकांची वाट सोपी ; अजित पवार
तसेच काल शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या सभेला देखील पोलिसांनी परवानगी नाकारली, आणि त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. त्यावर देखील जयंत पाटील म्हणाले की, सुषमा अंधारे यांना जळगाव येथे नजर कैदेत ठेवण्यात आले. यावरून व्यक्तिस्वांतत्र्यावर किती गदा आली आहे हे स्पष्ट होते. प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार लोकशाहीने दिला आहे.
“राष्ट्रवादी काॅंग्रेसचे 12 नेते फुटले, फक्त मुहूर्त ठरायचा बाकी”
दरम्यान, राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारची स्थापना झाली., सर्व पक्ष एकत्रित येण्यावर जास्त प्राधान्य देतो. जिल्ह्यातील, शहारातील नेत्यांना आम्ही काही सुचना दिलेल्या आहेत की, जेवढे शक्य होईल तेवढे त्या जिल्ह्यात किंवा शहारात महाविकास आघाडी टिकवण्याचा प्रयत्न करा. जर त्यात अपयश आले तर स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही आमच्या पक्षाच्या त्या जिल्ह्यातील नेत्यांना दिलेले आहेत. अशी प्रतिक्रिया देखील जयंत पाटलांनी व्यक्त केली आहे.
Read also
- “सुषमा अंधारेंना नजरकैदत ठेवले”; शिंदे-फडणवीस सरकार घाबरलेत का?
- शिंदे गटाचे 12 आमदार बाद होणार..! सरकार वाचवण्यासाठी फडणवीसांची रणनीती, काॅंग्रेसचे 22 आमदार फुटले..?
- “सरकार कोसळवणं हेच अजित पवारांचे काम, आम्ही फक्त जनतेसाठी..” दिपक केसरकर
- अंधेरी पोटनिवडणुकीत मतदारांनी केले घरून मतदान..! ९१.१६ टक्के मतदारांनी बजावला हक्क
- मावाळचं राजकारण तापलं..! मामा-भाचे यांच्यात दिवाळीनंतरही लेटर बॉम्ब फटाके