नांदेड : मराठवाडा आणि विदर्भाचा मागासलेपणा दूर करण्यासाठी भाजप उमेदवाराला निवडून द्या. मराठवाडा/विदर्भ वैधानिक विकास मंडळ बंद करण्याचा निर्णय या सरकारने घेतलाय, राष्ट्रवादीच्या आमदारांनी यावर आक्षेप तरी घेतला का? जे वातावरण देशात आहे तेच महाराष्ट्रात आहे. त्यामुळे राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचेच उमेदवार निवडून येतील, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
ते सोमवारी नांदेडमधील प्रचारसभेत बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी वीज बिल, मराठा आरक्षणासह इतर मुद्द्यांवरून महाविकासआघाडी सरकारला लक्ष्य केले. आपला मित्र बेईमान निघाला. मित्राने असंगाशी संग केला, अशी टीका फडणवीस यांनी शिवसेनेवर केली. लॉकडाऊनच्या काळात भरमसाठ वीज बिलं आली. पण जी वीज वापरलीच नाही तर त्याचे बिल कसे भरणार? त्यामुळे ही निवडणूक सरकारला शॉक देण्याची निवडणूक आहे, असे फडणवीस यांनी म्हटले.
भाजप, महाविकास आघाडी, मनसेच्या उमेदवारांविरोधात तक्रार
विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उभे असलेल्या भाजप, मनसे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार पुणेस्थित वकील अभिषेक हरिदास यांनी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या तक्रारीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अरुण लाड, भाजपचे संग्राम देशमुख आणि मनसेच्या उमेदवार रुपाली पाटील या तीन उमेदवारांनी निवडणूक आयोगाला खोटी माहिती पुरवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
‘हायकोर्टात कमावलं ते सुप्रीम कोर्टात गमावलं’
आमच्या सरकारच्या काळात ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले. पण या सरकारला ते टिकवता आले नाही. या सरकारमध्ये समन्वयाचा अभाव आहे. आपण जे हायकोर्टात कमावले ते सुप्रीम कोर्टात गमावले. राज्य सरकारने मराठा आणि ओबीस समाजाला समोरासमोर उभे करु नये, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
Read Also :
तीन महिन्यात ठाकरे सरकार पडेल, आपलं सरकार कसं येणार ते लवकरच सांगतो : दानवे
वीज बिलाविरोधात भाजपचे आंदोलन म्हणजे मगरीचे अश्रू प्रकाश आंबेडकरांची टीका
‘आम्हाला चंपा, टरबुजा बोललेले कसे चालते?’
बॅनरवरून काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा फोटो गायब, महाविकास आघाडीच्या बैठकीत राडा
‘आपला मुख्यमंत्री, आपले नशीब, आपले दुर्दैव, आपली जबाबदारी’, मनसेचा हल्लाबोल