मुंबई : बांधकाम व्यावसायिक अन्वय नाईक आणि त्यांची आई कुमुद नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामीला रायगड पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या राहत्या घरी पोलिसांनी जाऊन हि कारवाई केली असून त्याला अलिबाग न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आता रायगड पोलीस त्याची पोलीस कोठडीची मागणी करणार आहे. तर अर्णब गोस्वामी पुन्हा जामिनासाठी अर्ज करू शकतात. अर्णब गोस्वामीला अटक करण्यासाठी रायगड पोलीस आणि महाराष्ट्र गृह विभागाने गुप्त पणे 40 जणांची टीम तयार केली होती. अत्यंत पद्धतशीरपणे प्लॅन करण्यात आला होता. याची सर्व आखणी महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आली होती.
पोलिसांना होती अर्णब शहर सोडण्याची भीती
मुंबई पोलिसांनी टीआरपी प्रकरणात अर्नबची चौकशी सुरु केल्यानंतर अर्नबविरुद्ध नवनवीन कारवाया सुरु होणार हे स्पष्ट होत. पण अन्वय नाईक प्रकरणात अर्नबला अटक करताना खूप काळजी घेण्यात आली. त्याला अटक होणार हे त्याला कळू दिल गेलं नाही. त्याला माहित न करता याच्यावर पाळत ठेवण्यात आली,त्याच्या घराबाहेर पोलिसांनी गस्त घातली होती, एवढच काय तर अर्नबच दार कोण उघडणार? त्याच्यासोबत कोण बोलणार? त्याला कोण पकडणार? हि सर्व प्लांनिंग करण्यात आली होती.
गृहमंत्री अनिल देशमुख काय म्हणाले?
महाराष्ट्रात पोलीस हे नियमानुसार काम करत असून त्यात कुठलाही राजकारण नाही. जेव्हा मला नाईक कुटुंब भेटले तेव्हा मला धक्का बसला कि असं महाराष्ट्रात घडू शकत? नाईक कुटुंबियांना आम्ही न्याय देऊ असं देशमुखांनी सांगितलं आहे. सुशांतसिंग प्रकरणात भाजपने निव्वळ राजकारण केले त्यात कुठलेही पुरावे नव्हते पण आता नाईक कुटूंबीयांकडे सक्षम पुरावे आहेत आणि आम्ही त्यानुसार कारवाई करत आहोत, असं महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.
Read Also :
‘त्याच दिवशी मी शपथ घेतलेली, अर्णबला सोडणार नाही’
रोहित पवारांच्या यशासाठी ‘मातोश्रीं’नी कसली कंबर; ‘सुनंदा पवार’ उतरल्या मैदानात
व्लादिमिर पुतीन यांना गंभीर आजार , राष्ट्रपतीपद सोडणार ?
‘कराल काय स्वतःला अटक??? न्या स्वतःला फरफटत’ , राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
कोरोनाच्या पार्शवभूमीवर यंदाचं हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होणार?