मुंबई : उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरीमध्ये आंदोलन करुन घरी परतणाऱ्या शेतकऱ्यांचा गाडीखाली चिरडल्या गेल्याने मृत्यू झाला. यावेळी झालेल्या हिंसाचारात एकूण ८ लोकांचा मृत्यू झाला. या घटनेचे पडसाद आता देशभरात उमटताना दिसून येता आहेत. लखीमपूरमध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ ११ ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. या संदर्भात आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
राज्यात लवकरच सत्ताबदल, शिवसेनेचे 12 आमदार आमच्या संपर्कात : बबनराव लोणीकर
लखीमपूर खीरी मध्ये झालेल्या घटनेत शेतकऱ्यांना चिरडण्यात आलं, या घटनेचा निषेध करण्यासाठी ११ ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद ठेवण्यात येणारं असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. कायदा चिरडला जातो, गुन्हेगारांना मोकाट सोडलं जातं हे सर्व देशातील जनतेनं पाहिलं त्यामुळे या बंदमध्ये लोक स्वत: सहभागी होतील असं राऊत यांनी सांगितलं. शेतकऱ्यांचे खुन करुन केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा मोकाट फिरत असल्याचा गंभीर आरोप यावेळी संजय राऊत यांनी केला.
अजित पवारांच्या समर्थनात पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं जोरदार आंदोलन
भाजपने शेतकऱ्यांची लुट करण्यासाठी कायदे केले. त्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा करायला केंद्र सरकार तयार नाही. केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने ताफ्याने शेतकऱ्यांना चिरडलं. तसेच त्या प्रकरणातील आरोपी पळून गेला, लखीमपूर सारखी घटना घडल्यानंतर भाजपनेते त्यांना भेटायला जाऊ शकत नाही. त्यामुळे भाजप हा शेतकऱ्यांची हत्या करणारा पक्ष असल्याचा गंभीर आरोप राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी यावेळी केला. उत्तर प्रदेशच्या जुलमी सरकारला विरोध दर्शवण्यासाठी हा बंद असल्याचं यावेळी नवाब मलिक यांनी सांगितलं. तसेच ११ ऑक्टोबरला होणाऱ्या बंदला रात्री १२ पासून बंदला सुरूवात होणार असून त्यात अत्यावश्यक सेवांना कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन नवाब मलिक यांनी कार्यकर्त्यांना केलं.
Read Also :
- एकत्र आलेत ठाकरे आणि राणे, मला आठवते युतीचे गाणे; रामदास आठवलेंची भन्नाट चारोळी
- बाळासाहेबांनी खोटं बोलणारांना शिवसेनेतून हाकलून लावलं; मुख्यमंत्री ठाकरेंचा राणेंवर हल्लाबोल
- मंचावर येण्यापूर्वी मुख्यमंत्री माझ्या कानात बोलले, मी एक शब्द एकला – नारायण राणे
- विमानतळ नको म्हणून आंदोलन करणारे आज मंचावर आहेत; नारायण राणेंचा रोख कुणाकडे?
- विमानतळाच्या उद्धाटनला शेजारी-शेजारी बसले; तरीही राणे-ठाकरेंनी एकमेकांकडे पाहिलं नाही